Goa bike theft case Dainik Gomantak
देश

Goa Crime: दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; कर्नाटकातील दोन युवकांना अटक, वास्को पोलिसांची कारवाई

Goa bike theft case: वास्को शहरातील विविध भागातून चोरी झालेल्या दुचाकी प्रकरणांची उकल करत पोलिसांनी कर्नाटकातील दोन युवकांना अटक केली आहे.

Sameer Amunekar

पणजी: वास्को शहरातील विविध भागातून चोरी झालेल्या दुचाकी प्रकरणांची उकल करत पोलिसांनी कर्नाटकातील दोन युवकांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांची नावे वैभव दत्तात्रय रणदिवे (१९) आणि अझरन इक्बाल शेख (१८) अशी आहेत. हे दोघेही कर्नाटक राज्यातील रहिवासी असून वास्को परिसरात येऊन दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये सहभागी होते.

वास्को पोलिस ठाण्याच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्यांनी वास्को शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन दुचाक्या चोरल्याची माहिती आहे.

या कारवाईनंतर पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, या दोघांचा संबंध इतर चोरीच्या घटनांशीही आहे का याबाबत तपास सुरू आहे.

वास्को पोलिस निरीक्षकांनी सांगितले की, शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. नागरिकांना आपल्या वाहनांवर सुरक्षा लॉक बसवण्याचे आणि सार्वजनिक ठिकाणी वाहन पार्क करताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND VS NZ: किवींचा धुव्वा उडवण्यासाठी 'रो-को' सज्ज! कधी आणि कुठे पाहता येईल पहिला एकदिवसीय सामना? जाणून घ्या

'कुशावती' जिल्ह्याचा उदय! जिल्हा मुख्यालयाचा मान मिळाल्याने केपेवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

विदेशी माणसांप्रमाणेच विदेशी झाडेही आक्रमक! आपली जैवविविधता वाचवण्यासाठी 'देशी' वृक्षांची गरज

VIDEO: अर्शदीप सिंगच्या रन-अपची विराटनं उडवली खिल्ली! रोहितलाही हसू आवरले नाही; सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! गौरव बिद्रेचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला, विलंब होतो म्हणून जामीन मिळणार नाही

SCROLL FOR NEXT