Amit Shah  Dainik Gomantak
देश

Amit Shah : 2023 मध्ये छत्तीसगडला नक्षलवादापासून मुक्ती, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांचा दावा, राज्य सरकारवर केला हल्लाबोल

अमित शहा यांनी छत्तीसगडमधील कोरबा येथे एका विशाल जनसभेला संबोधित केले.

दैनिक गोमन्तक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज छत्तीसगडमध्ये पोहोचून राज्य सरकारवर हल्लाबोल केला. अमित शहा यांनी छत्तीसगडमधील कोरबा येथे एका विशाल जनसभेला संबोधित केले. ते म्हणाले की, मी छत्तीसगडमध्ये श्री रामच्या मातृगृहात आलो आहे. छत्तीसगडला राज्याचा दर्जा मिळावा यासाठी लढा दिला असून काँग्रेसने अडथळे निर्माण करण्याचे काम केले आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले जेव्हा अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हाच राज्याचे हे स्वप्न पूर्ण झाले.

या बैठकीत अमित शहा यांनी काँग्रेस राज्याची लूट करत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सध्याच्या राज्य सरकारला विचारले, तुम्ही राज्याला काय दिले? गरिबी, बेरोजगारी, नक्षलवाद हे तुमचे योगदान आहे. अमित शाह म्हणाले की, रमणसिंग चावल वाला बाबा आहेत, पण काँग्रेस पुरवठा हिसकावत आहे.

अमित शहा म्हणाले की, भ्रष्टाचार, चोरी आणि बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सर्व झाडे तोडून आदिवासीं लोकांच्या घरांवर ताबा मिळवत आहेत. काँग्रेसने गरिबी हटवण्याऐवजी राज्यातील गरिबांना त्रास दिला आहे. भाजपने लोकांना लसीकरण करून कोरोनापासून वाचवले. 2024 पूर्वी आपला देश नक्षलवादमुक्त होईल असे ते बोलत होते.

  • 2023 मध्ये राज्य नक्षलवादमुक्त होईल

मोदीजींनी डिएमएफ (DMF) च्या माध्यमातून देशातील आदिवासींना 64 हजार कोटी दिले, असेही अमित शहा म्हणाले. छत्तीसगडला विकासासाठी 9 हजार कोटींहून अधिक निधी मिळाला. पण तो काँग्रेस नेत्यांच्या विकासासाठी वापरला गेला. त्याने स्वत:साठी एक ऑडी खरेदी केली. 2024 मध्ये भाजप आणि 2023 मध्ये राज्यात सत्ता आल्यास आपला देश नक्षलवादमुक्त होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT