Ravi Shankar Prasad Dainik Gomantak
देश

सनातन धर्माचा विरोध करुन व्होट बँकेचे राजकारण करण्याचा विरोधकांचा छुपा अजेंडा- रविशंकर प्रसाद

Sanatan Dharma Row: देशात मागील दिवसांपासून सनातन धर्माच्या मुद्यावरुन राजकारण तापले आहे.

Manish Jadhav

Sanatan Dharma Row: देशात मागील दिवसांपासून सनातन धर्माच्या मुद्यावरुन राजकारण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत.

यातच आता, प्राचीन श्रद्धा परंपरांबद्दल द्रमुकच्या नेत्यांकडून वारंवार टीकाटिप्पणी होत असताना विरोधी पक्षनेत्यांच्या "मौन" वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपने मंगळवारी सनातन धर्मावर व्होट बँकेच्या राजकारणासाठी हल्ला करण्याचा इंडिया युतीचा छुपा अजेंडा असल्याचा आरोप केला.

दरम्यान, या मुद्द्यावरुन भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागले.

काँग्रेस (Congress) नेतृत्वावर निशाणा साधताना प्रसाद म्हणाले की, 'सोनिया गांधी या प्रकरणावर जितक्या काळ मौन बाळगतील तितके हे स्पष्ट होईल की, सनातन धर्माला विरोध करणे हा इंडिया युतीचा छुपा अजेंडा आहे.'

सनातन धर्माला विरोध करणे हा या युतीचा अजेंडा असल्याच्या द्रमुक नेत्याने नुकत्याच केलेल्या टिप्पणीवर प्रसाद यांनी ताशेरे ओढले. भाजप विरोधकांच्या या युतीला एक स्पष्ट ठराव मांडण्यास भाग पाडले, असेही प्रसाद पुढे म्हणाले.

दुसरीकडे, द्रमुकने आपल्या टीकेचे समर्थन करण्यासाठी सनातन धर्माचा हिंदूंमधील जातीय भेदभावाशी संबंध जोडला. यावरही प्रसाद यांनी निशाणा साधला.

प्रसाद म्हणाले की, शब्बीर, केवट आणि संत रविदास यांसारख्या महान संतांनी मागास जातीमधील लोकांसाठी मंदिरे बांधली. सनातन धर्माचा असा विश्वास आहे की, कोणतीही व्यक्ती त्याच्या भक्तीने त्याची जात-पात आणि सामुदायिक पार्श्वभूमी कोणतीही असली तरी ईश्वर प्राप्ती करु शकतो.' तर दुसरीकडे, प्रत्येक धर्माचा आदर करणे यावर कॉंग्रेसचा विश्वास आहे.

प्रसाद पुढे असेही म्हणाले की, द्रमुकपासून ते राष्ट्रीय जनता दल आणि समाजवादी पक्ष (Samajwadi Party) अशा काही पक्षांचे नेते सनातन धर्म आणि हिंदू धर्माशी संबंधित पवित्र ग्रंथांवर टीका करत आहेत.

त्यांना इतर धर्मांवर आणि त्यांच्या पवित्र ग्रंथांवर टीका करायला आवडते का? असाही सवाल त्यांनी यावेळी विचारला.

भारताच्या संस्कृतीचा आणि वारशाचा दररोज अपमान केला जात आहे, असे सांगून प्रसाद म्हणाले की, भाजप या मुद्द्यावरुन गावागावांत पोहोचेल आणि विकास आणि आपल्या वारशाबद्दल अवगत करेल.

सनातन धर्माचा अपमान का केला जात आहे. आम्ही हा अपमान सहन करणार नाही, असेही प्रसाद पुढे म्हणाले. भारताने नुकत्याच आयोजित केलेल्या G20 शिखर परिषदेत कोणार्क चक्र आणि प्राचीन नालंदा विद्यापीठाला दिलेल्या महत्त्वाविषयीही त्यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT