Belagavi marriage dispute Dainik Gomantak
देश

मुलगा पसंत नाही! साखरपुड्यानंतर लग्नास नकार, बेळगावातील मुलीवर 25 लाख खर्च केलेल्या कोल्हापूरच्या तरुणाची थेट कोर्टात धाव

Belagavi marriage dispute: तरुणाने तरुणीला विविध भेटवस्तू खरेदी करुन देण्यासाठी तब्बल २५ लाख रुपये खर्च केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

कोल्हापूर: साखरपुडा झाल्यानंतर मुलगा पसंत नसल्याचे सांगत मुलीने लग्नास नकार दिला. याप्रकरणी कोल्हापूरच्या तरुणाने कोर्टात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने त्याला पोलिस तक्रार दाखल करण्याची सूचना केली. त्यानुसार याप्रकरणी पोलिस तक्रार दाखल करण्यात आलीये. तरुणाने मुलीवर २५ लाख रुपये खर्च केल्याचे त्याने तक्रारीत म्हंटल आहे.

मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या तरुणाने बेळगावच्या तरुणीला लग्नासाठी मागणी घातली. तरुणीने लग्नासाठी होकार दिल्यानंतर दोघांचा साखरपुडा देखील उरकला. यामध्ये दोन्हीकडचे कुटुंबीय देखील सहभागी होते.

यानंतर तरुणाने तरुणीला विविध भेटवस्तू खरेदी करुन देण्यासाठी तब्बल २५ लाख रुपये खर्च केले. पण, अचानक तरुणीने मुलगा पसंत नसल्याचे कारण देत लग्नास नकार दिला.

तरुणीने लग्नास नकार दिल्याचे समजताच तरुणाच्या कुटुंबीयांना चांगलाच धक्का बसला. माहिती घेण्यासाठी तरुणीच्या घरच्यांना संपर्क केला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

दरम्यान, तरुणाने याप्रकरणी दाद मागण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने तरुणाला पोलिसांत तक्रार दाखल करण्याची सूचना केली.

तरुणाने उद्यमबाग पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांकडून फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बागातील 'त्या' प्रकाराबाबत उत्कंठा वाढली! क्राईम ब्रँचकडून गुन्ह्याची नोंद; व्हिडिओतील टोळक्यापर्यंत पोलिस पोहोचले

VIDEO: "नुसते फटके मारुन चालत नाही!" बाबर आझमचा 'स्लो' खेळ अन् 'फास्ट' उत्तर; सोशल मीडियावर फुटले वादाला तोंड

Bihar Food Poisoning: सत्यनारायणाचा प्रसाद ठरला जीवघेणा! मुजफ्फरपूरमध्ये 100 हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा; एकाच वेळी अख्खं गाव पडलं आजारी

IPL 2026 Points Table : राजस्थानला नमवून SRH चा गुणतालिकेत धमाका! मोठ्या उलटफेरासह टॉप-5 मध्ये एन्ट्री; मुंबई, चेन्नई आणि कोलकाताची अवस्था बिकट

IPL 2026: उष्णतेचा आयपीएल खेळाडूंवर परिणाम; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास; वाढत्या आर्द्रतेचा फटका

SCROLL FOR NEXT