Bihar Dainik Gomantak
देश

Bihar: एकाच परिसरातील 40 महिलांच्या पतीचं नाव 'रुपचंद', जातनिहाय गणनेत झाला खुलासा

बिहारमधील अरवाल जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे 40 महिलांना एकच पती आहे. ज्याचे नाव 'रुपचंद' आहे.

Manish Jadhav

Bihar: बिहारमधील अरवाल जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे 40 महिलांना एकच पती आहे. ज्याचे नाव 'रुपचंद' आहे. येथे होत असलेल्या जातनिहाय जनगणनेच्या दुसऱ्या फेरीत हा खुलासा झाला आहे.

अरवाल जिल्ह्यातील एका रेड लाइट एरियामध्ये सुमारे 40 महिलांनी 'रुपचंद' नावाच्या व्यक्तीचा उल्लेख पती म्हणून केला आहे. जनगणना करत असलेल्या अधिकाऱ्यांनी मुलांना विचारले असता त्यांनीही आपल्या वडिलांचे नाव 'रुपचंद' असे सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक 7 मध्ये अनेक वर्षांपासून नाच-गाणी करुन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या नर्तिका महिलांचे वास्तव्य आहे.

ज्यांना कोणताही आसरा नाही, त्यामुळे या महिलांनी आपल्या पतीचे नाव रुपचंद असे सांगितले. ही घटना आजूबाजूच्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.

दरम्यान, बिहारमधील (Bihar) अरवाल जिल्ह्यात जातनिहाय जनगणनेदरम्यान एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. शहरी भागातील रेड लाईट एरियातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये एक व्यक्ती सुमारे 40 महिलांचा पती आहे.

प्रत्यक्षात अधिकाऱ्यांनी महिलांना त्यांच्या पतीचे नाव विचारले असता सुमारे 40 महिलांनी त्यांच्या पतीचे नाव 'रुपचंद' असल्याचे सांगितले. याशिवाय सर्व मुलांनी देखील आपल्या वडिलांचे नाव 'रुपचंद, असे सांगितले.

वास्तविक, सध्या बिहारमध्ये जातनिहाय जनगणना सुरु आहे. या दरम्यान अधिकारी घरोघरी जाऊन लोकांची प्रत्यक्ष पडताळणी करुन त्यांची माहिती घेत आहेत. नगर परिषद परिसरातील वॉर्ड क्रमांक 7 रेड लाईट एरियात अधिकारी पोहोचले असता सुमारे 40 महिलांनी (Women) त्यांच्या पतीचे नाव ‘रुपचंद’ असे सांगितले.

रेड लाईट एरियामधील प्रकरण

राजीव रंजन राकेश यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून रेड लाईट एरियात नाच-गाणी करुन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या नर्तिका महिलांचे वास्तव्य आहे. ज्यांना कोणताही आसरा नाही. अशा सर्व स्त्रिया रुपचंदला आपला पती मानतात, ज्याला आजपर्यंत कोणीही पाहिलेलं नाही.

तसेच, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करुन जातनिहाय जनगणना करु नये, असे म्हटले होते. केंद्राने सांगितले की, जातींची गणना करणे हे क्लिष्ठ आणि अवघड काम आहे.

असे असतानाही नितीश कुमार सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. बिहारमध्ये घरोघरी जाऊन जातनिहाय जनगणना केली जात आहे, त्यानंतर ही बाब समोर आली. परंतु लोक वारंवार एकच प्रश्नच उपस्थित करत आहेत की, 'रुपचंद' कोण आहे, ज्याला इतक्या बायका आणि मुले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: खून प्रकरणातील आरोपी, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सहकाऱ्याला गोवा पोलिसांनी कशी अटक केली?

Asia Cup 2025: यूएईमध्ये भारताची कामगिरी कशी? पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाणा रेकॉर्ड, तरीही टीम इंडिया विजेतेपदाची दावेदार

Viral Video: डॉगेश भाई से पंगा नहीं… ! जंगलाच्या राणीला दिली जबरदस्त टक्कर; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

Iran: इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सची मोठी कारवाई! 5 पोलिसांच्या हत्येचा बदला घेत 13 दहशतवाद्यांचा केला खात्मा VIDEO

Monthly Horoscope September 2025: सप्टेंबरमध्ये 'या' 5 राशींचे भाग्य उजळणार! ‘भद्र राजयोग’ देणार सुख-समृद्धी; धन-संपत्तीत होणार मोठी वाढ

SCROLL FOR NEXT