Earthquake Jammu-Kashmir: Dainik Gomantak
देश

Earthquake In Jammu-Kashmir: जम्मु-काश्मिरमध्ये पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टल स्केलवर 4.3 तीव्रता

जम्मु-काश्मिरमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहे.

Puja Bonkile

Earthquake In Jammu-Kashmir: जम्मु-काश्मिर पुन्हा एकदा भुकंपाच्या धक्क्यांनी हादरले आहे. आज सकाळी 2 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आहे.

या भुकंपाची तीव्रता रिश्टल स्केलवर 4.3 एवढी होती. अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही.

  • भूकंप कसे मोजले जातात?

भूकंप रिश्टर स्केलने मोजले जातात. भूकंपाच्या लहरींची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल हे गणितीय स्केल आहे, त्याला रिश्टर मॅग्निट्युड टेस्ट स्केल म्हणतात.

रिश्टर स्केलवर भूकंप 1 ते 9 च्या आधारे त्याच्या केंद्रापासून म्हणजेच केंद्रस्थानावरून मोजले जातात. हे स्केल पृथ्वीच्या आतून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेच्या आधारे भूकंपाची तीव्रता मोजते.

तज्ञांच्या मते भूकंपाची अनेक कारणे असू शकतात. पण आजच्या काळात भूकंपाचे प्रमुख कारण म्हणजे मानवी कृती आहे.

पृथ्वीच्या खोलीतून तेल काढले जात आहे, झाडांची संख्या कमी होत आहे आणि त्यांच्या जागी उंच इमारती बांधल्या जात आहेत. या सर्वांमुळे निसर्गाचा समतोल बिघडतो, त्यामुळे वेळोवेळी भूकंप होतात. 

  • भूकंप आल्यावर काय करावे आणि काय करू नये?

धक्के जाणवल्यास ताबडतोब जमिनीवर बसा आणि आपले डोके खाली टेकवा.

मजबूत टेबल किंवा फर्निचरच्या आवरणाखाली स्वतःचा बचाव करावा.

याशिवाय घरातील वडीलधाऱ्यांची आणि मुलांची विशेष काळजी घ्यावी. 

त्यांना प्रथम बचावाच्या पद्धती सांगून त्यांचे संरक्षण करा. 

जर भूकंपाचा धक्का खूप तीव्र असेल तर काळजीपूर्वक घरातून बाहेर पडा आणि मोकळ्या मैदानावर किंवा रस्त्यावर जावे. 

याशिवाय भूकंपाच्या वेळी काच, खिडकी, पंखा किंवा झुंबर इत्यादी जड आणि पडणाऱ्या वस्तूंपासून दूर राहा.

  • भूकंपाचे शास्त्रीय कारण देखील जाणून घ्या

भूकंप कसे आणि का होतात हे शास्त्रीयदृष्ट्या समजून घेण्यासाठी आपल्याला पृथ्वीची रचना समजून घ्यावी लागेल. वास्तविक ही पृथ्वी टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. त्याच्या खाली द्रव लावा आहे. या प्लेट्स सतत तरंगत राहतात आणि अनेक वेळा एकमेकांवर आदळतात. वारंवार आदळल्यामुळे अनेक वेळा प्लेट्सचे कोपरे वाकतात आणि जास्त दाब आल्यावर या प्लेट्स तुटू लागतात. अशा स्थितीत खालून बाहेर पडणारी ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते आणि या गडबडीनंतर भूकंप होतो.

  • भूकंपाचे केंद्र काय आहे?

भूकंपाच्या केंद्राला भूकंपाचे केंद्र असे म्हणतात ज्याच्या खाली भूगर्भीय ऊर्जा प्लेट्सच्या हालचालीमुळे बाहेर पडते. या ठिकाणी भूकंपाचा प्रभाव जास्तीत जास्त असतो आणि तेथे सर्वात मजबूत कंपन असते. 

कंपनाची वारंवारता कमी झाल्यामुळे त्याचा प्रभाव कमी होतो. परंतु रिश्टर स्केलवर 7 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप झाला तर 40 किमीच्या त्रिज्येत हादरे तीव्र होतात. भूकंपाची वारंवारता वरच्या दिशेने आहे की खालच्या दिशेने आहे यावर ते अवलंबून असते. जर कंपनाची वारंवारता वरच्या दिशेने असेल तर कमी क्षेत्र प्रभावित होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT