Aishwarya Rai birthday 2025
बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी ऐश्वर्या राय बच्चन आज तिचा ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. मिस वर्ल्डचा किताब जिंकून भारतीय सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या ऐश्वर्याने आपल्या अभिनय कौशल्याने आणि अद्वितीय सौंदर्याने जगभरातील चाहत्यांची मने जिंकली.
तिचा प्रवास फक्त यशानेच नव्हे तर वादांनीही भरलेला राहिला आहे. ऐश्वर्या अनेकदा वादांच्या भोवऱ्यात सापडली आहे, आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटना आजही लोक विसरू शकलेले नाहीत.
या अभिनेत्रीने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने जरी प्रेक्षकांची मने जिंकली, तरीही तिच्या आयुष्यातील काही वाद आजही सोशल मीडियावर चर्चिले जातात. पाहूया, ते कोणते वाद आहेत.
ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचे प्रेमसंबंध हे बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वाधिक चर्चित नाते मानले जाते. दोघे "हम दिल दे चुके सनम" चित्रपटानंतर जवळ आले, पण नंतर त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला. काही माध्यमांच्या अहवालानुसार, सलमानच्या रागीट स्वभावामुळे ऐश्वर्याने हे नाते संपवले. या वादामुळे ऐश्वर्याचे अनेक चित्रपट प्रोजेक्ट्स हातातून गेले आणि दोघांचे वैयक्तिक जीवन दीर्घकाळ चर्चेत राहिले.
सलमान खानपासून दूर गेल्यानंतर ऐश्वर्याचे नाव विवेक ओबेरॉय सोबत जोडले गेले. विवेकने एका प्रसिद्ध पत्रकार परिषदेत सलमानकडून धमकीचे फोन येत असल्याचा दावा केला होता. या घटनांनंतर विवेकच्या कारकिर्दीवर विपरित परिणाम झाला. ऐश्वर्याने कधीच या नात्याबद्दल खुलेपणाने बोलले नाही, परंतु या वादाने बॉलिवूडमध्ये मोठा गोंधळ उडवला होता.
ऐश्वर्या राय बच्चन झाल्यानंतर, तिचे जया बच्चन आणि श्वेता नंदा यांच्याशी तणावाचे वृत्त वारंवार समोर आले. अनेकदा ऐश्वर्या बच्चन कुटुंबाच्या फोटोंमधून अनुपस्थित असल्याने अफवा पसरल्या की, सासू-सून संबंध चांगले नाहीत. सध्या ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या हे अभिषेकपासून वेगळे राहत असल्याचे बोलले जाते, ज्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
सध्याच्या काळात ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यातील नात्याविषयी अनेक अटकळी लावल्या जात आहेत. काही कार्यक्रमांना ऐश्वर्या एकटी किंवा केवळ आराध्यासोबत उपस्थित राहिली, तर अभिषेक बच्चन इतर ठिकाणी एकटे दिसले. ऐश्वर्याने काही काळ लग्नाची अंगठी न घातल्यामुळे चाहत्यांमध्ये शंका निर्माण झाली. तथापि, दोघांनी अद्याप या बाबतीत अधिकृतपणे काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
ऐश्वर्याच्या सौंदर्याचे जगभर कौतुक झाले असले तरी, अनेकांनी तिच्या चेहऱ्यातील बदलांवरून शस्त्रक्रियेचे आरोप केले. आराध्याच्या जन्मानंतर तिच्या वजनवाढीवर आणि शरीरातील बदलांवरूनही ती सोशल मीडियावर ट्रोल झाली. मात्र, ऐश्वर्याने कधीच यावर प्रतिक्रिया दिली नाही आणि तिच्या कामावर लक्ष केंद्रित केले.
२००४ मधील कान्स फिल्म फेस्टिव्हल दरम्यान ऐश्वर्याने घातलेला ड्रेस चर्चेचा विषय ठरला. काहींनी तिचा लुक आंतरराष्ट्रीय दर्जाचा म्हटला, तर काहींनी “भारतीय अभिनेत्रीने एवढा उघड ड्रेस का घातला?” असा प्रश्न उपस्थित केला. तेव्हापासून तिच्या प्रत्येक रेड कार्पेट लूककडे लोकांचे विशेष लक्ष असते.
सर्व वादांनंतरही, ऐश्वर्या राय बच्चन आजही बॉलिवूडमधील सर्वात ग्रेशफुल आणि आदरणीय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिने नेहमी वादांपासून स्वतःला दूर ठेवले आणि आपल्या कामावर तसेच मुलगी आराध्याच्या संगोपनावर लक्ष केंद्रित केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.