PM Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

Modi Government: मोदी सरकारच्या सुधारणांमुळे 'अच्छे दिन'चा प्रत्यय, 'भारत पुन्हा एकदा...'

Modi Government: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश नवीन उंची गाठत आहे. आता विदेशी ब्रोकरेज एजन्सीनेही ही गोष्ट मान्य केली आहे.

Manish Jadhav

Modi Government: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश नवीन उंची गाठत आहे. आता विदेशी संस्था ब्रोकरेज एजन्सीनेही ही गोष्ट मान्य केली आहे. ब्रोकरेज फर्म बर्नस्टाईनने सोमवारी नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळावर 31 पानांचा अहवाल प्रसिद्ध केला, जीएसटी सारख्या "ऐतिहासिक" सुधारणा आणि मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा खर्चामुळे भारत आज जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे.

दरम्यान, बर्नस्टाईन यांच्या 'द डेकेड ऑफ पीएम मोदी लीडरशिप - अ क्वांटम लीप' या अहवालात असे म्हटले आहे की, अनेक संस्थांसह कमजोर अर्थव्यवस्थेवर मात करत ऐतिहासिक सुधारणा, महागाई नियंत्रण, आर्थिक समावेशन आणि डिजिटायझेशन या आघाड्यांवर सरकारने खूप चांगले काम केले आहे. यासह भारताची (India) वाटचाल विकसित देशांप्रमाणे होत आहे.'

भारताने अनेक क्षेत्रात मोठी प्रगती केली

अहवालात पुढे म्हटले की, “भाग्य रातोंरात चमकता है'– काहींसाठी ते नशिबाने घडते तर बहुतेकांसाठी अनेक वर्षांच्या प्रयत्नांतून. भारताचीही अशीच काहीशी कहाणी आहे.” अहवालात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. यामध्ये डिजिटायझेशन, गुंतवणूक (Investment) आकर्षित करण्यासाठी उत्तम धोरणात्मक वातावरण आणि पायाभूत सुविधांवर वाढलेला खर्च यांचा समावेश आहे.

अहवालात पुढे असे म्हटले आहे की, गेल्या दशकातील अनेक वर्षांमध्ये आर्थिक वाढ मंदावली होती, परंतु सरकारने नवीन सुधारणांद्वारे अर्थव्यवस्थेला उर्जितावस्था आणली. पंतप्रधान मोदींनी नऊ वर्षांपूर्वी 'अच्छे दिन' चे आश्वासन दिले होते.

भ्रष्टाचार संपवणे...

पंतप्रधान मोदींनी आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी भ्रष्टाचार संपवण्याचे आश्वासन दिले होते. 2014 च्या भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात सुशासन आणि आर्थिक समृद्धीचे आश्वासन शीर्षस्थानी होते. भाजपने उच्च विकास, अधिक रोजगार निर्मिती आणि गुंतवणूक वाढण्याचे आश्वासन दिले होते.

बर्नस्टाईनने हा अहवाल तयार करताना काही निकषांचे मूल्यांकन केले आहे. 2014 पासून भारताने या पॅरामीटर्सवर कशा पद्धतीने कामगिरी केली हे ही अहवालातून स्पष्ट होते. अहवालात पुढे असेही म्हटले आहे की, 2014 पासून सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढ वार्षिक आधारावर 5.7 टक्के आहे.

कोविडपूर्व वाढ 6.7 टक्के होती. दुसरीकडे, संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) कार्यकाळात विकास दर 7.6 टक्क्यांपेक्षा किंचित कमी होता. त्या काळात कमी बेस इफेक्टचा लाभ मिळाला होता.

कमकुवत अर्थव्यवस्था वारसाहक्काने मिळाली

मोदी सरकारला 'कमकुवत अर्थव्यवस्था वारसाहक्काने मिळाली आणि अनेक संस्थाही अडचणीत होत्या', असे अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये यूपीए सरकारच्या निर्णयांना या अहवालात जबाबदार धरण्यात आले आहे.

अहवालात पुढे म्हटले की, जागतिक स्तरावर जीडीपीच्या बाबतीत भारत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. 2014 मध्ये भारत दहाव्या स्थानावर होता.

तथापि, दरडोई उत्पन्नाच्या आधारावर भारत या यादीत 127 व्या स्थानावर आहे. येथेही 2014 च्या तुलनेत भारताची स्थिती सुधारली आहे. 2014 मध्ये भारत 147 व्या क्रमांकावर होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT