टाइमपास टोळीला काम मिळालेल पाहून बरं वाटलं; आदित्य ठाकरेंची 'मनसे'वर बोचरी टीका

शरद पवारांनी 1999मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाले: राज ठाकरे
 Aditya Thackeray
Aditya ThackerayDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क येथे भाषण केले. दरम्यान त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. याचबरोबर त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले, शरद पवारांनी 1999मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाले. (MNS is BJPs C Team taunts Aditya Thackeray)

 Aditya Thackeray
नाशिकजवळ रेल्वे अपघात, एलटीटी-जयनगर एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाषणानंतर आता त्यांच्यावर टीका होत आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही राज ठाकरेंचा समाचार घेतला आहे. साम टीव्हीच्या कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे यांनी मनसे म्हणजे भाजपाची सी टीम असल्याचा उल्लेख केला. तसंच टाइमपास टोळीला काम मिळालं हे पाहून बरं वाटलं असा टोलाही लगावला.

 Aditya Thackeray
पैसे घ्याल तर ED लावू; चंद्रकांत पाटील यांची मतदारांनाच धमकी

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, जो पक्ष गेली इतकी वर्ष आपली भूमिका स्पष्ट करु शकला नाही त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं याचा विचार केला पाहिजे. आमचं हिंदुत्व वचनं पूर्ण करण्याचे आणि सेवा करण्याचे आहे. मनसेला मी टाइमपास टोळी म्हणायचो कारण ते टाइमपासच करायचे. पण आता मला बरं वाटतंय की भाजपाची सी टीम म्हणून त्यांना थोडं काम मिळाले आहे. बी टीम एमआयएम (AIMIM) आहे आणि सी टीम मनसे आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com