

सासष्टी: सध्या सर्वत्र उत्सवाचे वातावरण आहे. नाताळ नंतर नवे वर्ष उजाडणार आहे. त्यानंतर लगेच आपण मडगावच्या पालिका निवडणुकांच्या तयारीला सुरवात करणार आहे, असे फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकारांना सांगितले.
आपण इतर कुठल्याही पक्षांची वाट पाहणार नाही. कॉंग्रेसने काय तो निर्णय लवकर घ्यायला पाहिजे. पालिकेची तयारी आपण गंभीरपणे घेणार आहे. दवर्ली व मडगाव हे शेजारी आहे. दवर्लीत ज्यांनी आम्ही पाठिंबा दिलेल्या कॉंग्रेस उमेदवाराला मते दिली त्या प्रकारचे लोक मडगावातही आहेत. आम्ही केवळ टाईमपास म्हणून निवडणूक लढत नाहीत, असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे धोरण फोडा आणि राज्य करा, असे आहे. पण आता हे धोरण सासष्टीतील लोकांना चालणार नाही. सासष्टीतील लोक आता सामाजिक जाणीव असलेले झाले आहेत, असेही सरदेसाई यांनी सांगितले.
दवर्ली व नावेलीत कॉंग्रेसचा विजय झाल्याने भाजपने मध्यंतरी हे दोन्ही मतदारसंघ काबीज केले होते, ते केवळ निव्वळ नशीबाची साथ मिळाल्याने हे आता सिद्ध झाल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. दक्षिण गोवा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनीही सरदेसाईंची प्रशंसा केली. त्यांनी सांगितले की विजय आमच्यासोबत आहे हेच आमच्यासाठी महत्वाचे आहे.
‘आरजी’वर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सरदेसाई यांनी नकार दिला. ‘आरजी’चे अध्यक्ष मनोज परब यांना बोलावून हात वर केले हेच आमचे चुकले. आपण फातोर्डेकरांची त्यासाठी माफी मागतो. जर कॉंग्रेस व आपल्या पक्षात युती अगोदर झाली असती तरी या पेक्षा चांगली स्थिती झाली असती, असेही सरदेसाई म्हणाले. जर २०२७ मध्ये आमचे सरकार आले तर ग्रामीण विकास मंडळ बंद करून हा निधी जिल्हा पंचायतीला दिला जाईल. तसेच घटना दुरुस्तीच्या ७३व्या कलमानुसार जिल्हा पंचायतीला सर्व अधिकार देणार असे सरदेसाई यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.