

सासष्टी: यंदा पावसाचे प्रमाण दरवर्षीपेक्षा काहीसे कमी असले, तरी आवश्यक तेवढा पाऊस झाला आहे. यंदा पाऊस १०० इंचांचा टप्पा गाठेल. त्यामुळे राज्यात पाण्याची टंचाई भासणार नाही, अशी अपेक्षा जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केली.
साळावली धरण ६५ ते ७० टक्के भरले आहे. त्याचबरोबर आजपासून कुशावती नदीतील पाणी वापरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे साळावली धरणात तसेच सांगे परिसरात पुरेसे पाणी उपलब्ध राहणार आहे. सर्व धरणांवर पाण्याचे व्यवस्थापन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री शिरोडकर यांनी मडगाव येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
पूर्वी साळावली धरणातून ७० एमएलडी पाणी दवर्ली येथे पाठवले जात होते. मात्र, त्यापैकी ३० एमएलडी पाण्याचा अपव्यय होत होता. सांगे येथूनही पाणी सोडावे लागत होते; ते आता बंद होईल, अशी माहिती त्यांनी दिली. गोव्यातील नद्यांमध्ये जिथे-जिथे पाणी उपलब्ध आहे, ते वापरले जाईल. पाणी न वापरता ते समुद्रात जाऊ देणे आणि ते खारट होऊ देणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.
३० ते ४० एमएलडी पाणी वाचणार
केपे येथे कुशावती नदीतील ३० ते ४० एमएलडी पाणी पंप करून दवर्ली येथे पाठविले जाणार आहे. तेथून हे पाणी वेर्णा, जुवारी, कुठ्ठाळी व वास्को भागात पुरवले जाईल. कुशावती नदीतील पाण्याचा वापर सुरू झाल्याने साळावली धरणातील ३० ते ४० एमएलडी पाणी वाचणार असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.