Bihar Diwas: बिहारी नागरिकांनी गोव्यात गुण्यागोविंदाने राहावे! गोमंतकीय संस्कृती आत्मसात करा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

CM Pramod Sawant: गोव्यातील सर्व बिहारी नागरिकांनी डबल इंजिन सरकारला सहकार्य करावे. तसेच त्यांनी गोमंतकीयांसारखेच गुण्यागोविंदाने राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील लोक सर्वधर्म समभावाने राहतात बिहारचे नाव गुन्हेगारीतील सहभागामुळे खराब होत आहे. गोव्यातील सर्व बिहारी नागरिकांनी डबल इंजिन सरकारला सहकार्य करावे. तसेच त्यांनी गोमंतकीयांसारखेच गुण्यागोविंदाने राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

दरवर्षी २२ मार्च हा दिवस ‘बिहार दिन’ म्हणून साजरा केला जातो. बिहारसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या दिवशी राज्याचा वर्धापनदिन म्हणजे ‘बिहार दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या बिहार दिनाचा उत्साह गोव्यात देखील पाहायला मिळाला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे बिहार दिनानिमित्त पणजी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले. त्यांनी उपस्थितांसह बिहारी नागरिकांना बिहार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व बिहारी नागरिकांना गोव्याची संस्कृती जपण्याचे आणि येथील सामाजिक सौहार्दाचे पालन करण्याचे आवाहन केले.

यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ, खासदार सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व अन्य उपस्थित होते.

CM Pramod Sawant
CM Pramod Sawant: समुद्रकिनारी पिकनिक करु नका! सायन्स डे दिवशी मुख्यमंत्री असे का म्हणाले?

प्रवीण चौधरी म्हणाले, बिहारी हे संस्कारी, परोपकारी आणि सुविचारी आहेत. शंभर जणांना पुरून उरणारा हा बिहारीच असतो. बिहारी स्वाभिमानी आहेत, पण अभिमानी नाहीत. ते जेथे जातात तेथील मातीसाठी घाम गाळतात. तेथील संस्कृती आत्मसात करतात. सेवा, समर्पण व त्याग हे बिहारींचे वैशिष्ट्य आहे. यावेळी मूळ बिहारमधील, पण गोव्यात स्थायिक अशा अनेकांचा त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला.

CM Pramod Sawant
Goa CM Pramod Sawant: गोव्याच्या इतिहासात प्रमोद सावंत यांनी नोंदवला अनोखा विक्रम! मुख्यमंत्रीपदाची सलग सहा वर्षे केली पूर्ण

बिहारींचे मोठे योगदान

गोव्याच्या विकासात बिहारी नागरिकांचे मोठे योगदान आहे. एवढेच नव्हे, तर गोव्याच्या मुक्तिस्वातंत्र्यातही बिहारमधून आलेल्या स्वातंत्र्यसैनिकांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे गोवा राज्याला लवकर मुक्ती मिळण्यास मदत झाली. त्यांचे योगदान आम्ही विसरू शकत नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com