Harmanpreet Kaur Decision: गेम चेंजर निर्णय! हरमनप्रीतने सांगितला 'तो' एक क्षण, ज्यामुळे टीम इंडिया बनली 'वर्ल्डकप' चॅम्पियन

World Cup Final 2025 : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत करत पहिलीच विश्वचषक ट्रॉफी आपल्या नावे केली.
Harmanpreet Kaur Decision
Harmanpreet Kaur DecisionDainik Gomantak
Published on
Updated on

नवी मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत करत पहिलीच विश्वचषक ट्रॉफी आपल्या नावे केली. डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या रोमांचक सामन्यात भारताचा विजय झाला आणि संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण पसरलं.

भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत २९९ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेनेही दमदार सुरुवात केली. कर्णधार लॉरा वोल्वार्ड आणि सून लुस यांनी सावध पण आक्रमक खेळी करत भारतीय गोलंदाजांवर दबाव आणला. २० षटकांतच त्यांनी ११४ धावा फलकावर लावल्या होत्या. त्या क्षणी सामना पूर्णपणे दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकल्याचे दिसत होते.

Harmanpreet Kaur Decision
Goa Vehicle Sales: गोव्यात दिवाळीदरम्यान 'रेकॉर्डब्रेक' वाहन खरेदी! GST कपातीमुळे ग्राहकांची पसंती; 11317 गाड्यांची नोंदणी

सामन्याचा टर्निंग पॉइंट

या निर्णायक क्षणी हरमनप्रीत कौरने एक धाडसी निर्णय घेतला. मुख्य गोलंदाजांचा वापर थांबवून तिने शेफाली वर्माला गोलंदाजीची संधी दिली. आणि तिथूनच सामन्याचे चित्र पालटले. शेफालीने पहिल्याच षटकात सून लुसला बाद करत मोठा धक्का दिला. त्या विकेटनंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर दबाव वाढला आणि संघाची विकेट्स नियमित अंतराने पडू लागल्या.

शेफालीने केवळ फलंदाजीत ८७ धावांची खेळी केली नाही, तर गोलंदाजीतही २ महत्त्वाच्या विकेट्स घेत भारताला विजयाकडे नेले. तिच्या अष्टपैलू कामगिरीमुळे तिला "सामन्याची सर्वोत्कृष्ट खेळाडू" (Player of the Match) म्हणून गौरवण्यात आले.

हरमनप्रीत कौर म्हणाली...

विजयानंतर झालेल्या समारंभात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने तिच्या निर्णयाविषयी सांगितले. ती म्हणाली, “जेव्हा लॉरा आणि सून खेळत होत्या, तेव्हा आमच्यावर दबाव होता. मी शेफालीकडे पाहिले आणि मला जाणवले की आज तिचा दिवस आहे. अंतर्मनाने सांगितले की तिला एक षटक द्यावे, आणि तोच आमच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. ती म्हणाली होती, ‘जर तुम्ही मला गोलंदाजी करू दिली तर मी १० षटकेही टाकेन.’ आणि तिने तेच करून दाखवले."

हरमनप्रीत पुढे म्हणाली, “मी खूप भाग्यवान आहे की मला इतका अप्रतिम प्रेक्षकांचा पाठिंबा मिळाला. त्यांनी आमच्यावर नेहमी विश्वास ठेवला. जरी आम्ही सलग तीन सामने हरलो तरी संघाने एकमेकांवरचा विश्वास टिकवून ठेवला. तोच आत्मविश्वास आजच्या विजयामागे आहे.

Harmanpreet Kaur Decision
Goa Politics: "गोंयात सरकारी व्यवस्था असा कितें?",पोलीसच गुंड बनलेत, कायदा-सुव्यवस्था कोलमडलीये; युरी-सरदेसाईंचा थेट हल्ला

या स्पर्धेत भारताचा प्रवास काही सोपा नव्हता. सुरुवातीला संघाला पराभवांची मालिका झेलावी लागली, परंतु शेवटच्या टप्प्यात त्यांनी जबरदस्त पुनरागमन केले. सेमीफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचा पराभव केला आणि अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला हरवून इतिहास रचला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com