Viral Post: "आता तरी गंभीर व्हा!" विजयाचा पत्ता नाही अन् पराभवांचे रेकॉर्ड्स; नेटकऱ्यांनी गौतम गंभीरला धरलं धारेवर

Gautam Gambhir Troll: रविवारी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ४१ धावांनी पराभव केला.
Gautam Gambhir Troll
Gautam Gambhir TrollDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांची नियुक्ती झाल्यापासून टीम इंडिया एका नव्या युगाकडे वाटचाल करेल, अशी अपेक्षा चाहत्यांना होती. मात्र, वास्तव याच्या अगदी उलट दिसत आहे. रविवारी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ४१ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर सोशल मीडियावर गंभीरच्या प्रशिक्षकशैलीवर टीकेची झोड उठली आहे.

या पराभवासोबतच भारताने मायदेशातील वनडे मालिका १-२ ने गमावली आहे. विशेष म्हणजे, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच न्यूझीलंडने भारताला त्यांच्याच भूमीत वनडे मालिकेत धूळ चारली असून, या नामुष्कीनंतर गंभीरच्या प्रशिक्षकशैलीवर टीका केली जात आहे.

Gautam Gambhir Troll
Cyber Crime Goa: काळजी घ्या! गोव्यात सायबर भामट्यांकडून सुमारे 74 कोटींचा चुना! ज्‍येष्‍ठ नागरिक होताहेत टार्गेट

गंभीरच्या काळात पराभवांची मालिका

राहुल द्रविड यांच्यानंतर ९ जुलै २०२४ रोजी गंभीरने प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली. मात्र, गेल्या काही महिन्यांत भारतीय संघाने अशा काही पराभवांना तोंड दिले आहे, जे क्रिकेट इतिहासात यापूर्वी कधीही घडले नव्हते.

श्रीलंकेविरुद्ध २७ वर्षांनंतर द्विपक्षीय मालिका गमावण्यापासून या घसरणीला सुरुवात झाली. त्यानंतर घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत झालेला ऐतिहासिक व्हाईटवॉश हा गंभीरच्या प्रशिक्षक कारकिर्दीवरील सर्वात मोठा डाग मानला जात आहे.

Gautam Gambhir Troll
Goa Politics: 'निवृत्ती ही अफवा, पेडणेतूनच लढणारच'! माजी उपमुख्यमंत्री आजगावकरांचा निर्धार; 2027 विधानसभेसाठी ठोकला शड्डू

विक्रमांची 'गंभीर' पडझड

गंभीरच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने नको असलेल्या अनेक विक्रमांची नोंद केली आहे. यामध्ये खालील धक्कादायक आकडेवारी आहे:

  • ४५ वर्षांनंतर भारतीय संघ एका संपूर्ण कॅलेंडर वर्षात एकही वनडे सामना जिंकू शकलेला नाही.

  • बेंगळुरू कसोटीत भारत घरच्या मैदानावर पहिल्यांदाच ५० पेक्षा कमी धावसंख्येवर बाद झाला.

  • मायदेशात सलग तीन कसोटी सामने हरण्याची वेळ तब्बल ४७ वर्षांनंतर आली आहे.

  • वानखेडे स्टेडियमवर १२ वर्षांनंतर भारताला पराभवाचा सामना करावा लागला, तर न्यूझीलंडने ३६ वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकला.

सोशल मीडियावर चाहत्यांचा संताप

कधीकाळी आक्रमक रणनीतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या गंभीरच्या काळात भारतीय संघाची फलंदाजी आणि फिरकीपटूंना खेळण्याची क्षमता कमकुवत झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने पहिल्यांदाच आपले सर्व ३० बळी गमावले, जे भारतीय फलंदाजीच्या खालावलेल्या दर्जाचे लक्षण मानले जात आहे.

या ऐतिहासिक पराभवानंतर बीसीसीआय काही कठोर पावले उचलणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 'गंभीर' मार्गदर्शनाखाली टीम इंडियाला भविष्यातील मोठ्या स्पर्धांमध्ये विजय मिळवण्यासाठी आपली रणनीती पूर्णपणे बदलावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com