भारत आणि पाकिस्तान यांच्यात अलीकडेच युद्धबंदी झाल्यानंतर सीमारेषेवरील तणाव काहीसा निवळला आहे. पाकिस्तानकडून झालेल्या भ्याड हल्ल्यांना भारताने ठोस प्रत्युत्तर दिलं. या लष्करी कारवाईत भारतीय हवाई दलाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. अत्याधुनिक शस्त्रसज्जतेच्या जोरावर भारताने पाकिस्तानच्या तुलनेत एक पाऊल पुढे जात आघाडी घेतली. विशेषतः राफेल लढाऊ विमाने आणि S-400 क्षेपणास्त्र प्रणालीचा प्रभावी वापर करण्यात आला.
भारतीय जवानांचे मनोबल उंचावण्यासाठी आणि लष्कराच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट दिली. त्यांनी तेथील जवानांशी संवाद साधत त्यांचे अभिनंदन केले.
लष्कराला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ''संपूर्ण जगाने भारत माता की जयची शक्ती पाहिली. भारत माता की जय म्हणताच शत्रू थरथर कापायला लागतात. भारत माता की जयचा जयघोष रण मैदान आणि मिशनमध्ये केला जातो.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.