पणजी : राज्यातील सर्व रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्यानं रेशन कार्डांच्या ई-केवायसी प्रक्रेसंदर्भात अंतिम मुदत जाहीर केली आहे. खात्यानं काढलेल्या अधिसूचनेनुसार, ३० एप्रिल २०२५ ही रेशन कार्डांच्या ई-केवायसीसाठी अंतिम मुदत असेल.
जर या मुदतीपर्यंत संबंधित नागरिकांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्यांच्या रेशन कार्डावरील नावं वगळण्यात येतील, असा स्पष्ट इशारा पुरवठा खात्यानं दिला आहे. त्यामुळे अनेकांना शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत मिळणाऱ्या धान्याचा लाभ पुढे मिळणार नाही.
ई-केवायसी ही प्रक्रिया रेशन कार्डाच्या पारदर्शकतेसाठी आणि लाभार्थ्यांची अचूक ओळख पटवण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. अनेक ठिकाणी बनावट कार्डधारकांच्या तक्रारी आढळल्यानंतर ही प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.