Ankita Lokhande-Vicky Jain Dainik Gomantak
मनोरंजन

Ankita Lokhande: 'मी जर खरं सांगायला लागलो तर...'अंकिता अन् विकीमधील दुरावा कायम

Ankita Lokhande: जेव्हा तू मुनव्वरचा हात धरतेस. त्याला मिठी मारली तेव्हा मी देखील असेच वागायला हवे होते.

दैनिक गोमन्तक

Ankita Lokhande: बिग बॉसच्या घरात सतत भांडणे, वादविवाद पाहायला मिळतात. या १७ व्या सीझनमध्ये अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन सामील झाले आहेत. त्यांच्यात सातत्याने वाद पाहायला मिळतात. फॅमिली वीक मध्ये अंकिताची आई त्यांना समजावून गेली होती की तुम्ही या प्लॅटफॉर्मवर जास्त भांडण करत आहात. टीव्हीवर ते पाहणे चांगले दिसत नाही. तुमच्यातील भांडणे कमी करणे गरजेचे आहे.

आता यानंतरही त्यांच्यात मोठी भांडणे पाहायला मिळाली आहेत. शो चा नवा प्रोमो समोर आला आहे. 'बिग बॉस सीझन 17' च्या प्रोमोमध्ये विकी जैन आणि अंकिता लोखंडे रुममध्ये आहेत. जिथे विकीने विचारलं ' काय प्रॉब्लेम आहे?' तर अंकिता म्हणते की 'तुझ्यामध्ये सहानुभूती नसल्यामुळे आपल्या नात्यात अडचण आली आहे.'

तेव्हा विकी म्हणतो, 'जेव्हा तू मुनव्वरचा हात धरतेस. त्याला मिठी मारली तेव्हा मी देखील असेच वागायला हवे होते. तुझी सर्व नाती पवित्र आहेत आणि माझी सर्व नाती वाईट आहेत. यानंतर त्यांच्यातील वाद वाढत जातात. शेवटी विकी म्हणतो मी जर खरं सांगायला लागलो तर तू ऐकू शकणार नाहीस.

या जोडप्यातील भांडणे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शोचा फिनाले जवळ येत असून आता कोणता स्पर्धत शो ची ट्रॉफी आपल्या नावावर करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "आता बस करा माही भाई!" धोनीला नीट चालताना येईना, IPLपूर्वी फिटनेसवर प्रश्नचिन्ह, व्हिडिओ पाहून फॅन्सचं टेन्शन वाढलं

Savoi Verem: सफर गोव्याची! श्री अनंत देवाचं मनमोहक देऊळ आणि हिरवीगार कुळागरं लाभलेलं 'सावई-वेरे'

Sal River Pollution: गंभीर अवस्था! प्रदूषणामुळे 'साळ नदी'त प्राणवायूचे प्रमाण शून्य, कचरा-सांडपाण्यामुळे धोक्याची घंटा

Goa School Admission: गोव्यात पहिलीच्या प्रवेशाबाबत नियमात मोठा बदल; वयाची अट बदलली, सरकारने घेतला मोठा निर्णय

Opinion: भारतातील शहरांना भविष्यात अधिकाधिक पाण्याची गरज भासणार आहे, पण आपण ही मागणी पूर्ण करू शकू का?

SCROLL FOR NEXT