Amitabh Bachchan  Dainik Gomantak
मनोरंजन

Amitabh Bachchan: "मलाही आहे ही वाईट सवय" अमिताभ बच्चन यांनी स्वत:च केलं कबूल

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केबीसीच्या सेटवर त्यांच्या एका सवयीबद्दल सांगितलं आहे.

Rahul sadolikar

Amitabh Bachchan : बॉलीवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन त्यांच्या शिस्तप्रिय आणि काटेकोर दैनंदिन जीवनशैलीसाठी ओळखले जातात. पण बिग बींनी त्यांच्या एका वाईट सवयीविषयी सांगितलं आहे. सोशल मिडीयावरची ही वाईट सवय आहे आणि त्यात खूप वेळ जातो असंही बिग बींनी सांगितलं आहे.

सोशल मिडीयाचं व्यसन

सोशल मीडिया हे देखील एक व्यसन आहे. त्यावर रिल्स पाहणे ही आता सवय झाली आहे. यात किती तास निघून जातात ते कळतही नाही. हे कदाचित तुमच्यासोबत घडले असेल किंवा तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिले असेल.

 पण तुम्हाला माहित आहे का की खुद्द अमिताभ बच्चन देखील या व्यसनाचे बळी आहेत! 'कौन बनेगा करोडपती सीझन 15'मध्ये त्याने हा खुलासा केला आहे.

रील्स पाहतात

अमिताभ बच्चन यांनी KBC 15 मध्ये खुलासा केला की, जेव्हा ते ब्लॉग लिहायला जातात तेव्हा ते सोशल मीडियावर रील पाहू लागतात. कोण काय बोलतंय हेही ते बघू लागतात आणि या प्रकरणात दीड-दोन तास कधी निघून जातात, तेही लक्षात येत नाही.

सोशल मिडीयापासून दूर

अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला की, 'सुमारे 1-2 वर्षांपूर्वी माझी मेकअप आर्टिस्ट रेणुका पिल्लई यांनी मला सांगितले होते की मी किती पूर्वी माझ्या ओळींची रिहर्सल करायचो आणि आता अचानक मी नेहमी फोनवर असतो. ती बरोबर आहे हे माझ्या लक्षात आले आणि दुसऱ्याच क्षणी मी माझ्या मोबाईल मधून सर्व सोशल मीडिया डिलीट केला.

सोशल मिडीयाचं व्यसन

अमिताभ बच्चन असेही म्हणतात की त्यांनाही सध्या सोशल मीडियाच्या व्यसनाचा सामना करावा लागत आहे. तो म्हणाले, 'मी तुम्हाला सांगतो, मी काही दिवसांपासून पाहतोय, मी एक ब्लॉग लिहितो, मला असे वाटते की ते पब्लिश करूया (सोशल मीडियावर), मग मी त्यातून काहीतरी काढून त्यावर पोस्ट करतो, मग ती सवय होऊन जाते.

पुढची व्यक्ती काय म्हणाली? त्याच्याशी आपला काही संबंध असो वा नसो, दीड-दोन तास निघून जातात. तुम्हाला ते कळत नाही आणि नंतर लक्षात येते, ४ वाजले आहेत, ही खूप वाईट सवय आहे.

गोव्याकडे येणारी बस अंकोल्यात उलटली; एकाचा मृत्यू, 20 प्रवासी गंभीर जखमी; चालकाचे सुटले नियंत्रण

Stray Cattles: डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव कायम, अपघातांचा धोका; दोन वर्षांत 15 गुरांचे बळी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ अव्वल दहातून बाहेर! 3 महिन्यांत 3.21 लाख प्रवासी कमी; विमान वाहतुकीत मंदीचे संकेत

वीरेश बोरकर यांची वाढती लोकप्रियता मनोज परब यांना खुपली? 'रिव्होल्युशनरी गोवन्स' पक्षाच्या चिंधड्या उडण्यामागचं खरं कारण काय?

Bhagur Village: इंग्लंडला धडकी भरवणारं भारतातील 'ते' खोडकर गाव, जाणून घ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'भगूर'चा थरारक इतिहास

SCROLL FOR NEXT