Traffic Jam On Mumbai Goa Highway After Holi
माणगाव: कोकणात मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा करुन मुंबईच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. होळीनिमित्त मुंबई,पुणे, ठाणेमधून मोठ्याप्रमाणात कोकणवासीय आपल्या कुटुंबीयांसमवेत गावी गेले होते. सलग सुट्ट्यांचा आनंद घेवून परतीच्या प्रवासाला लागलेल्या या चाकरमान्यांना रायगडमधील माणगावात मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. महारामार्गावर लागलेल्या लांबच-लांब रांगांमुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत.
दरम्यान, कोकणात (Konkan) होळीचा आणि सुट्ट्यांचा आनंद घेवून परतणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला आहे. ग्रामीण भागातील लोकांनाही माणगावातील वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी रविवारी (16 मार्च) महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र तरीही वाहतूक कोंडी झाल्याने चाकरमान्यांची दैना उडाली आहे. माणगावात कळमजे फाटा ते ढालघर फाट्यादरम्यान ही मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
दुसरीकडे, मुंबईहून (Mumbai) होळीसाठी गावाकडे जातानाही चाकरमान्यांचा मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. रायगडमधील माणगावात महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या होत्या. माणगाव, इंदापूर, नागोठणे, वडकळ परिसरात मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.