Abu Asim Azmi, Samajwadi Party, Maharashtra president, and MLA ANI
महाराष्ट्र

'मुस्लिम शहरांची नावे बदलून काय होणार?' सपा नेते अबू आझमींचा ठाकरेंना सवाल

आम्ही काय कराव, आम्ही जिथे जातो तिथे आम्हाला फटकारले जाते- अबू असीम आझमी

दैनिक गोमन्तक

मुंबई: समाजवादी पार्टी (SP) महाराष्ट्र युनिटचे अध्यक्ष अबू असीम आझमी (Abu Asim Azmi, Samajwadi Party) यांनी सभागृहात उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार निशाणा साधला आहे. "आम्ही तटस्थ राहिलो, याचे आम्हाला दुःख आहे. पण आम्ही काय कराव, आम्ही जिथे जातो तिथे आम्हाला फटकारले जाते. आमचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव बदलले. नाव बदलून महाराष्ट्राचा विकास होत असेल तर ठीक आहे, तुम्ही बदला नाव, पण मुस्लिम शहरांची नावे बदलून काय होणार? तुम्हाला या देशाला विनाशाच्या उंबरठ्यावर आणायचे आहे. मी बोलायला लागताच तुम्ही आरडाओरडा सुरू करता," असे म्हणत आझमी यांनी ठाकरेंच्या निर्णयावर हल्लाबोल केला. (Maharashtra Politics)

अबू आझमी यांच्या वक्तव्यावर भास्कर जाधव यांचे प्रत्युत्तर

अबू आझमी यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात उत्तर दिले. अबू आझमी यांनी मुस्लिम शहरांच्या नामांतराचा मुद्दा उपस्थित केल्याचे जाधव म्हणाले. 'मला त्यांना सांगायचे आहे की, औरंगजेब दहशतवादी होता. त्यांनी अत्याचार केले म्हणून आम्ही औरंगाबादला संभाजी महाराजांचे नाव दिले. तुम्ही (आझमी) याला हिंदू मुस्लिम मुद्दा बनवू नका.'

शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महात्वाचे निर्णय

दरम्यान,महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलचं गाजत आहे. यातच ठाकरे सरकारच्या कार्यकाळात पार पडलेल्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामातंर करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाने औरंगाबादचे 'संभाजी नगर' आणि उस्मानाबादचे 'धाराशिव' असे नामांतर करण्यास मंजूरी दिली. त्याचबरोबर नवी मुंबई विमानतळाचे नाव बदलून 'डी. बी. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ' करण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी औरंगाबादचे नामांतर 'संभाजीनगर' करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला होता. मंगळवार, 28 जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामांतरण झाल्याची माहिती दिली.

त्याच रात्री मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला

खरं तर, , हिंदुत्वाच्या मूळ विचारसरणीशी तडजोड केल्याचा आरोप शिवसेनेवर (Shiv Sena) होत असताना हा निर्णय घेण्यात आला होता. मध्य महाराष्ट्रातील शहरांचे नामांतर करण्यावरुन भाजप (BJP) महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधण्याच्या डावात होता. आपल्या पक्षातील बंडखोरीनंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे मोठे निर्णय घेतले. आणि त्याच रात्री मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. आणि महाराष्ट्रात आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

SCROLL FOR NEXT