Narayan Rane

 

Dainik Gomantak 

महाराष्ट्र

महाराष्ट्राला 'लगान' ची टीम नकोय : नारायण राणे

जिल्ह्यातील देवदेवतांच्या कृपेमुळे सत्ता आली आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकारण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा गाजू लागले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेवर नारायण राणे यांच्या अर्थात भाजपच्या पॅनलने विजय संपादन केला आहे. या विजयाने आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. विजय संपादन केल्यानंतर नारायण राणे माध्यमांशी बोलणार आहेत. मागील काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची चर्चा राज्यात चांगलीच रंगली होती. मात्र या विजयाने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. दुसरीकडे संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर काल जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. यामध्ये आमदार नितेश राणे यांना न्यालायकडून दिलासा मिळालेला नाही.

नारायण राणे म्हणाले, ''ही सत्ता माझी नसून भारतीय जनता पक्षाची सत्ता आलेली आहे. जिल्ह्यातील देवदेवतांच्या कृपेमुळे सत्ता आली आहे. नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या परिश्रमामुळे जिल्हा बॅंकेवर सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले. सिंधुदुर्गमधील देवदेवतांचा हा विजय आहे.''

'आता पुढील लक्ष महाराष्ट्रात सरकार स्थापनेचं आहे. विजय संपादन करताना खऱ्या अर्थान अकलेचा वापर करण्यात आला आहे. जिल्हा बॅंकेवर मिळालेला विजय हा सिंधुदुर्गमधील जनतेचा विजय आहे. आता लक्ष महाराष्ट्रात सत्ता आणण्याचं आहे. 36 मतं मिळत नाहीत आणि विधानसभेची गोष्टी हे विरोधी लोक करतात. सगळ्यांना पुरुन उरलो, केंद्रापर्यंत पोहोचलो, कुठे थांबलो नसल्याचे, देखील ते यावेळी म्हणाले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'घाली धिंगाणा, मुंबईचा शाणा...' कोकणातील क्रिकेटवेड्या चाहत्यांनी 'हिटमॅन'साठी गायलं खास गाणं, पाहा व्हायरल व्हिडिओ

Dabolim Airport: दाबोळीला 'देशांतर्गत विमानतळ' दर्जा देण्‍याचा प्रस्‍ताव नाही

ISL 2026: एफसी गोवाची अपराजित मालिका खंडित, बंगळूर एफसीचा 2-0 असा सफाईदार विजय

Black Coffee Music Event controversy: 'ब्लॅक कॉफी' कार्यक्रमावरून वाद, काँग्रेसकडून चौकशीची मागणी; प्रशासनावर मोठे आरोप

उन्हाचा चटका आणि महागाईचा फटका! घामाच्या धारांनी नागरिक हैराण; मागणी वाढल्याने भाजीपाला-फळं महागली

SCROLL FOR NEXT