Uddhav Thackeray  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Shiv Sena च्या बंडखोरीने उद्धव ठाकरेंच्या व्यक्तिमत्त्वात किती बदल झाला? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड हे शिवसेनेतील सर्वात मोठे बंड आहे.

दैनिक गोमन्तक

Shiv Sena Leaders: एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड हे शिवसेनेतील सर्वात मोठे बंड आहे. या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन दूर तर केलेच पण आता त्यांच्या हातातून शिवसेनेचीही लगाम हिसकावून घेतली जाण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत पक्षाची कमान आपल्या हातून सुटू नये म्हणून उद्धव ठाकरेंनी आपल्या व्यक्तिमत्त्वात अनेक बदल केले आहेत.

दरम्यान, महिनाभरापूर्वीपर्यंत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि आता त्यांच्या जागी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री आहेत. आपल्या हातातून अचानक सत्ता जाणे आणि आता शिवसेनेवरील वर्चस्वावर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह यामुळे उद्धव ठाकरे बदलले आहेत.

बंडखोरीमुळे ठाकरेंचे व्यक्तिमत्त्व बदलले

उद्धव ठाकरे आता ते सर्व काही करत आहेत जे ते पूर्वी कधीच करत नव्हते. गेल्या काही वर्षांत ज्यांनी त्यांना पाहिले त्यांच्या मते ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वात मोठा बदल झाला आहे. त्यांच्याकडे आपल्या माणसांना भेटण्यासाठी वेळ नसल्याचा आरोप उद्धव ठाकरेंवर मागील काही दिवसांपूर्वी सासत्याने करण्यात आला. त्यांनी आपल्या निकवर्तीय लोकांचा कोटा करुन ठेवला आहे, ते फक्त त्यांच्यासोबत बसतात आणि उठतात. ते इतर नेते आणि कार्यकर्त्यांना भेटत नाहीत. मात्र सत्ता हातातून गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपला दृष्टिकोन बदलला आहे.

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्राधान्य दिले जाऊ लागले

बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी समेट घडवून आणण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाल्यापासून ते पक्षाचे मुख्यालय असलेल्या शिवसेना भवनात जात आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत. त्यांच्या घरीही ते पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना भेटतायेत.

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल (Prime Minister Narendra Modi) असं म्हटलं जातं की, 'पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदा घेणे बंद केले. उद्धव यांनीही मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यापासून प्रेरणा घेत पत्रकार परिषदा घेणे बंद केले. पंतप्रधान मोदी ज्या पद्धतीने मन की बात कार्यक्रमातून आपले विचार जनतेपर्यंत पोहोचवतात, त्याच पद्धतीने ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी एकतर्फी संवाद साधत असत. पत्रकारांना त्यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळाली नाही.'

उद्धव ठाकरे मुंबईबाहेर गेलेच नाहीत

उद्धव यांच्या व्यक्तीमत्वात बदल झाला आहे. जेव्हापासून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री ते माजी मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून ते माध्यमस्नेही बनले आहेत. आतापर्यंत त्यांनी दोनदा पत्रकार परिषदा घेतली आहे. उद्धव ठाकरे सहसा मुंबईबाहेरचा प्रवास करत नाहीत, जेव्हा कधी मोठी आपत्ती आली किंवा मोठा राजकीय मेळावा असेल तेव्हाच ते मुंबईबाहेर जायचे. परंतु आता ते बाहेर पडू लागले आहेत. त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे राज्यभरातील अनेक शहरांमध्ये शिवसंवाद यात्रा करत आहेत. पुढील महिन्यातही आपण राज्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे उद्धव यांनी जाहीरपणे सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mathura Boat Accident: वृंदावनमध्ये काळजाचा थरकाप! यमुनेत 27 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

VIDEO: सलमान खानचा चढला पारा! चाहत्याच्या 'त्या' कृतीवर भडकला भाईजान; नेटकरी म्हणाले, ''तो तुझा बालपणीचा मित्र आहे का''?

Mumbai Gold Smuggling Bust: मुंबई विमानतळावर 38 कोटींचं सोनं जप्त! डीआरआयकडून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; 26 जणांना ठोकल्या बेड्या

Horoscope April 2026: ग्रहांचा राजा बदलणार तुमचं भविष्य! बँक बॅलन्स वाढणार, नशीब चमकणार; 'या' राशीच्या लोकांची चांदीच चांदी

Mojtaba Khamenei: 'शहीदांच्या रक्ताचा बदला घेणार!' युद्धविरामानंतर खामेनेईंची गर्जना; शत्रूला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचं ठणकावलं

SCROLL FOR NEXT