RT-PCR चाचणीवरून महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा बंद Dainik Gomantak
महाराष्ट्र

RT-PCR चाचणीवरून महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा बंद

कोविड निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र सक्तीवरून दोन दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा खंडित झाली असून दोन्ही राज्यांची बसवाहतूक सध्या सीमेपर्यंतच सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

कोविड निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र (RT-PCR) सक्तीवरून दोन दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra-Karnataka) बस सेवा (Bus Service) खंडित झाली असून दोन्ही राज्यांची बसवाहतूक सध्या सीमेपर्यंतच (State Border) सुरू आहे. कर्नाटक राज्यात कोविड चाचणी प्रमाणपत्राची सक्ती आणि महाराष्ट्रात प्रवेश करण्यास सुट दिल्यामुळे काही प्रवाशांनी कर्नाटक परिवहन विभागाच्या बसेस मिरज स्थानकावर रोखल्याने कर्नाटकने बस वाहतूक थांबवण्याचा विर्णय घेतला आहे. कोरोना रूग्णसंख्येचा विचार केला तर सांगली, कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे आघाडीवर असल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशाकडे कोरोना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे. Maharashtra-Karnataka bus service closed due to RT-PCR test()

या उलट कर्नाटकातून सांगली आणि मिरजे मध्ये येणाऱ्या प्रवाशांची तपासणीही केली जात नाही तर ही सक्ती कशासाठी, असा प्रश्न उभा करत दोन दिवसांपूर्वी मिरज बस स्थानकावर कर्नाटक राज्य परिवहन विभागाच्या बसेस थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे कर्नाटकने आपल्या बसेस केवळ म्हैसाळ सीमेपर्यंतच सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आणि आता महाराष्ट्र परिवहन विभागाच्या बसेसही फक्त कर्नाटकच्या सीमेपर्यंतच धावत आहेत. बस सेवा खंडित झाल्याने कोविड प्रमाणपत्र असलेल्या प्रवाशांचीही गैरसोय होतांना दिसत आहे. सीमाभागातून अन्य गावी जाणाऱ्या प्रवाशांना सीमेपर्यंत जाण्यासाठी खासगी वाहनाचा वापर करावा लागत आहे.

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटक राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी सक्ती करण्याच्या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काल राष्ट्रवादी काँग्रेसने याविरोधात आंदोलन केल्यानंतर आज शिवसेनेने याच मागणीसाठी निदर्शने केली होती. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कागल येथे महाराष्ट्र राज्याचा शेवटचा टोल नाका आहे. तेथून पुढे काही अंतरावर कर्नाटक राज्यातील कोगनोळी या गावात पहिला टोल नाका सुरू होतो. कर्नाटकात कोरोना संसर्ग वाढू नये याची दक्षता म्हणून राज्य शासनाने राज्यात प्रवेश करणार्‍यांसाठी आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणी अहवाल सक्तीचा केला आहे. मात्र ही सक्ती कोल्हापूर जिल्हा अंतर्गत प्रवास करणाऱ्यांसाठी अडचणीची ठरतांना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Goa High Court Promotion Case: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; कायदा विभागातील 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT