Maharashtra-Karnataka border dispute
Maharashtra-Karnataka border dispute Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद! शिंदे सरकारचा मोठा निर्णय, सीमाभागातील 865 गावांना करणार आर्थिक मदत

Pramod Yadav

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा चर्चेत आला आहे. सांगली जिल्ह्यातील 40 गावांनी केलेल्या ठरावाचा कर्नाटक गांभीर्याने विचार करत असल्याचे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले होते. यावर आता महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकाने मोठा निर्णय घेतला आह. सीमाभागातील 865 गावांना मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील एकही गाव बाहेर जाणार नाही असे म्हटले होते.

(Maharashtra-Karnataka border dispute)

सीमाभागातील बेळगावसह 865 गावांतील संस्था आणि संघटनांना आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. 865 गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, धर्मादाय, सांस्कृतिक, निम सार्वजनिक संस्था आणि संघटनांना मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संबंधिचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री धर्मादाय निधीसाठी पुढील वर्षासाठी म्हणजे 2023-24 सालासाठी 10 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे.

दरम्यान, सांगलीच्या जत तालुक्यातील 40 गावांनी केलेला ठराव फार जुना असल्याचा निर्वाळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसेच, महाराष्ट्रातील एकही गाव बाहेर जाणार नाही. उलट बेळगावसह इतर गावे महाराष्ट्रात घेण्याचा आमचा प्रयत्न आहे असे फडणवीस म्हणाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT