Eknath Shinde and Devendra Fadnavis  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra सरकारची मोठी घोषणा! कोरोनाकाळातील सामाजिक, राजकीय गुन्हे मागे घेण्याचा निर्णय

जिल्हास्तरावर समिती गठीत करण्याचे आदेश

गोमन्तक डिजिटल टीम

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadanvis Government) अंतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात (Corona Virus) घडलेल्या राजकीय आणि सामाजिक गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांना मात्र कोणताही दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. यासाठी जिल्हास्तरावर समिती गठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हास्तरावर गठीत केलेली समिती पोलीस उपायुक्त आणि उप विभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली काम करेल. कोणते गुन्हे मागे घ्यायचे याचा निर्णय या समितीकडून घेतला जाणार आहे. राज्य सरकारकडून 21 मार्च 2020 ते 31 मार्च 2022 या दरम्यान राज्यात नोंद करण्यात आलेले खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना काळात केलेली आंदोलने आणि त्याविरोधात नोंद केलेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. पण ज्या आंदोलनामध्ये 5 लाखांपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे, ते गुन्हे मागे घेण्यात येणार नाहीत. ज्या आंदोलनामध्ये वा गुन्ह्यांमध्ये जीवित हानी झालेलं नाही ते गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Childhood Depression: स्मार्टफोन आणि नैराश्य

Goa Monsoon: गोव्यात मान्सूनचे आगमन; हवामान विभागाडून चार दिवसांचा 'यलो अलर्ट'!

मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोक्यात; पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Power Cuts: हसापूर, हणखणेतील वीज समस्या सोडवा; काँग्रेस कार्यकर्त्यांची वीज कार्यालयावर धडक, साहाय्यक अभियंत्यांशी चर्चा

Hasapur Bridge: हसापूर पूल महिन्याभरात वाहतुकीस खुला; काँक्रीटचे काम पूर्ण

SCROLL FOR NEXT