CM Devendra Fadnavis Dainik Gomantak
महाराष्ट्र

Nagpur-Goa Shaktipeeth Expressway: मुख्यमंत्री फडणवीसांनी टाकला विकासाचा गिअर, पदभार स्वीकारताच गोवा-नागपूर शक्तिपीठ महामार्गाला दिली गती

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गोवा-नागपूर शक्तिपीठ महामार्गाचे काम मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गोवा-नागपूर शक्तिपीठ महामार्गाचे काम मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांनी‌ही या महामार्गाच्या कामाला गती देण्याची घोषणा केली आहे.

पत्रादेवी येथे हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ ला जोडला जाणार आहे. पत्रादेवी ते नागपूर हे ८०५ किलोमीटरचे अंतर असून शेजारील सिंधुदुर्गासह १२ जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे. ग्रीनफिल्ड पद्धतीने बांधला जाणारा हा महामार्ग विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील (Konkan) महत्त्वाची धार्मिक आणि पर्यटनस्थळे जोडणार आहे.

महामार्गाच्या भूसंपादनाचे काम सुरू आहे. प्रकल्पासाठी सल्लागार समिती स्थापन केली असून मार्गाचे अंतिम संरेखन निश्चित केले आहे. महामार्गासाठी ८ हजार हेक्टर जमिनीचे संपादन सुरू असून शेतकऱ्यांना (Farmers) बाजारभावाच्या तिप्पट दराने नुकसान भरपाई दिली जात आहे.

  • लांबी : 805 किलोमीटर

  • पत्रादेवीपासून‌ नागपूरपर्यंत थेट जोडणी

  • प्रवासाचा वेळ सध्याच्या 18 तासांवरून केवळ तासांपर्यंत कमी होणार

  • खर्च : सुमारे हजार कोटी रुपये

  • प्रकल्पाची सुरुवात 2025 मध्ये करून पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjai Temple Case: मोरजाई देवस्थानच्या मालमत्तेत अपहाराचा आरोप! माजी अध्यक्षासह दोघांना अटक; मांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Indonesia Passenger Ship: इंडोनेशियात 240 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता; वादळी हवामानामुळे संपर्क तुटल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

Goa Politics: भाजपला तिसऱ्या आघाडीची भीती नाही! दामू नाईकांचा विरोधकांना टोला; '2027 मध्ये पुन्हा भाजपच सत्तेत येणार'

Goa Congress: काँग्रेसची 'गोवा राखण यात्रा' 22 सप्टेंबरपासून! 27 दिवसांत सर्व 40 मतदारसंघांचा दौरा; जमीन, पर्यावरण आणि अस्मितेसाठी लढ्याची घोषणा

Guru Mangal Yuti 2026: 18 सप्टेंबरला महाचमत्कार! गुरु-सेनापती युतीनं चमकणार 4 राशींचं नशीब; हाती लागणार कुबेराचा खजिना

SCROLL FOR NEXT