Jiva Mahala History Dainik Gomantak
महाराष्ट्र

Jiva Mahala History: होता 'जिवा' म्हणून वाचला 'शिवा'! जिवा महाला कसे बनले शिवाजी महाराजांचे 'अंगरक्षक'; वाचा ऐतिहासिक भेटीची कहाणी!

Maratha History: छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान आणि शूर अंगरक्षक जिवा महाला यांच्या शौर्याची गाथा मराठा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे.

Sameer Amunekar

छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान आणि शूर अंगरक्षक जिवा महाला यांच्या शौर्याची गाथा मराठा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. 'होता जिवा म्हणून वाचला शिवा' (जिवा होता म्हणून शिवराय वाचले) ही म्हण त्यांच्या अतुलनीय कामगिरीची साक्ष देते. जिवा महाला आणि शिवाजी महाराज यांची पहिली भेट ही एका कुस्तीच्या दंगलीच्या निमित्ताने झाली, असा उल्लेख अनेक ऐतिहासिक कथा आणि लोकसाहित्यात आढळतो.

जिवा महाला हे मूळचे उमरठ (सुभेदार तानाजी मालुसरे यांचे गाव) गावचे होते आणि ते दांडपट्टा चालवण्यात अत्यंत तरबेज होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना लहानपणापासूनच पहिलवानीचे धडे दिले होते. अनेक नोंदीनुसार, ही भेट उमरठ गावात भरलेल्या वार्षिक यात्रेच्या निमित्ताने झाली. या यात्रेत दरवर्षी सायंकाळी कुस्तीची दंगल भरवली जात असे. यावर्षीच्या दंगलीला खुद्द शिवाजी महाराज उपस्थित राहणार असल्याची बातमी होती, ज्यामुळे लोकांमध्ये खूप उत्साह होता.

दंगलीमध्ये लहान-मोठ्या कुस्त्या झाल्यानंतर, प्रमुख लढत लखु बेरड (एक प्रसिद्ध पैलवान) आणि भिकाजी ढेरे (हिरडस मावळातला पैलवान) यांच्यात होणार होती. मात्र, लखु बेरड याच्या पायाला दुखापत झाल्याने तो लढू शकला नाही. यानंतर, 'भिकाजीशी लढायला या गावात कोणी आहे का?' अशी दवंडी (घोषणा) देण्यात आली.

या घोषणेमुळे मैदानाच्या एका बाजूला कुजबुज सुरू झाली आणि एका उंच, रांगड्या गड्याने कपडे काढून लांघ (लंगोट) चढवून मैदानात प्रवेश केला. त्याला पाहताच उपस्थितांनी "आरं आला रं जिवा आला" अशा आरोळ्या मारल्या. हा गडी दुसरा कोणी नसून जिवा महाला होता.

राजांनी तानाजी मालुसरेंकडे चौकशी केली असता, तानाजींनी जिवाजींच्या कुस्तीतील कौशल्याची आणि विशेषतः त्यांच्या दांडपट्टा चालवण्याच्या उत्कृष्टतेची माहिती दिली.

जिवा महाला आणि भिकाजी ढेरे यांच्यात कुस्तीची सलामी झाली. दोघांनीही एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेत सावधपणे सुरुवात केली. भिकाजीने जिवाला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला, पण जिवाजी तितक्याच चपळाईने त्याचे डाव चुकवत होते.

अखेरीस, भिकाजीने पटात शिरण्याचा प्रयत्न केला, पण सावध असलेल्या जिवाने त्याला फिरवून बाहेरची टांग लावली. या डावात भिकाजी अक्षरशः ५-६ फूट वर उडून पाठीवर पालथा पडला आणि जिवा महाला विजयी झाले. हा चित्तथरारक विजय जीवाने महाराजांसमोर मिळवला.जिवा महालांच्या या पराक्रमाने शिवाजी महाराज खूप प्रभावित झाले. त्यांनी प्रेक्षकांच्या गर्दीतून स्वतः जिवा महालांकडे धाव घेतली आणि आनंदाने त्यांना मिठी मारली.

जिवा महालांच्या या अद्भुत सामर्थ्याने आणि कौशल्याने महाराज अत्यंत खुश झाले आणि त्यांनी जिवा महालांना आपल्या सैन्यात (आणि पुढे आपल्या अंगरक्षकांच्या तुकडीत) सामील करून घेतलं.

अनेक पोवाडे, कथा आणि लोकसाहित्यामध्ये शिवाजी महाराज आणि जिवा महाला यांची पहिली भेट कुस्तीच्या दंगलीत झाल्याचे वर्णन आहे. या भेटीनंतरच जिवा महाला हे कायमस्वरूपी महाराजांच्या जवळचे आणि अत्यंत विश्वासू सहकारी बनले. याच जिवा महालांनी पुढे अफजल खानाच्या भेटीच्या वेळी सय्यद बंडाचा हात कापून महाराजांचे प्राण वाचवले, ज्यामुळे "होता जिवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण रूढ झाली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव वाचवला

मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराजांचे नाव जितक्या अभिमानाने घेतले जाते, तितक्याच सन्मानाने घेतले जाते त्यांच्या मावळ्यांचे, त्यांच्या निष्ठावान शिपायांचे. या निष्ठेचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे "जिवा महाला" ज्याने स्वतःचा जीव पणाला लावून म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव वाचवला.

साल होतं १६५९. विजापूरचा सेनापती अफजलखान हा आपल्या भव्य सैन्यासह शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी निघाला होता. महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगांत, महाबळेश्वरजवळील प्रतापगड किल्ल्यावर दोघांची भेट ठरली. हा इतिहासातला एक निर्णायक क्षण होता. कारण इथून पुढे महाराष्ट्राच्या स्वराज्याचा पाया अधिक मजबूत झाला.

शिवाजी महाराजांनी धोरणीपणे, परंतु अत्यंत जोखमीचा निर्णय घेतला. अफजलखानाशी “मैत्रीची भेट” घेण्याच्या नावाखाली ते प्रत्यक्ष भेटीस गेले. त्यांच्यासोबत काही मोजकेच विश्वासू मावळे होते त्यात अग्रस्थानी होता जिवा महालदार.

अफजलखानाची कपटी योजना होती. त्याला शिवाजी महाराजांना मिठी मारून मारायचं होतं. पण महाराजही तेवढेच चतुर. त्यांनी अंगावर “वाघनखं” घेतली होती. भेटीत अफजलखानाने नेमके महाराजांच्या पाठीवर हात ठेवताच गळा आवळण्याचा प्रयत्न केला, पण त्याच वेळी महाराजांनी वाघनख्याने त्याच्या पोटात वार केला. अफजलखान गंभीर जखमी झाला आणि ओरडला.

त्याच्या पाठोपाठ त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा तलवार उगारत महाराजांकडे धावला.पण तिथेच ‘जिवा महालदार’ पुढे आला! त्याने आपल्या तलवारीने सय्यद बंडाला ठार केलं आणि महाराजांचा प्राण वाचवला. त्याच क्षणी इतिहासात अमर झालं वाक्य घुमलं “हाता जिवा म्हणून वाचला शिवा!”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Forex Reserve Record: भारताच्या परकीय चलन साठ्याने रचला इतिहास! फॉरेक्स रिझर्व्ह 785 अब्ज डॉलर पार; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

Horoscope 12 September 2026: सूर्याचं नक्षत्र बदलताच 'या' राशींचं चमकणार भाग्य, शनिवार ठरणार वरदान; होणार अफाट धनलाभ

Mapusa Coconut Price: महागाईत गणेशोत्सवाचा आनंद वाढला! म्हापशात अवघ्या 2 रुपयांत नारळ; दोन दिवसांत तब्बल 9 ते 10 हजार नारळांचे वाटप

Galjibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात! अनेक वर्षांपासून सुरू असलेली धूप वाढली; वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

SCROLL FOR NEXT