Covid-19 Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा कसा झाला कोरोनामुक्त

ट्रेसिंग, टेस्ट आणि ट्रिटमेंट या त्रिसूत्री नियमांचे योग्य नियोजन आणि सामूहिक प्रयत्नामुळे भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाला.

दैनिक गोमन्तक

भंडारा : ट्रेसिंग, टेस्ट आणि ट्रिटमेंट या त्रिसूत्री नियमांचे योग्य नियोजन आणि सामूहिक प्रयत्नामुळे भंडारा (Bhandara) जिल्हा कोरोनामुक्त (Coronavirus) झाला. काल उपचार घेत असलेल्या एकमेव रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तब्बल 15 महिन्यानंतर जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यात आता रुग्ण नसले तरी, सर्वांनी अधिक काळजी घेऊन कोरोनाचा संसर्ग होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी नागरीकांना केले आहे. त्याचबरोबर भंडारा कोरोनामुक्त होणारा महाराष्ट्रातील (Maharashtra) पहिला जिल्हा ठरला आहे. (How Bhandara district of Maharashtra become covid-19 free)

महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा पहिला कोरोनामुक्त जिल्हा ठरला आहे जिथे महाराष्ट्रात कोरोनाचा एकही सक्रिय रुग्ण नाही. काल शुक्रवारी भंडारा जल्ह्यात शेवटचा सक्रिय रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याच वेळी, शुक्रवारी 578 नमुन्यांपैकी एकही नमुना कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही.

जिल्हाधिकारी संदीप कदम म्हणाले की, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आणि ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंटच्या धोरणाची अंमलबजावणी केल्यामुळे हे शक्य झाले आहे. गेल्या वर्षी 27 एप्रिल रोजी गारडा बुद्रुक गावात पहिला रुग्ण सापडला होता.

पहिला मृत्यू 12 जुलै 2020 रोजी कोरोनामुळे झाला होता

यानंतर, यावर्षी 12 एप्रिल रोजी जिल्ह्यात जास्तीत जास्त 1596 नवीन प्रकरणे नोंदली गेली. जिल्ह्यात 18 एप्रिल रोजी सर्वाधिक 12,847 सक्रिय रुग्ण आढळले होते. त्याचवेळी, 12 जुलै 2020 रोजी जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली होती. या वर्षी 1 मे रोजी जिल्ह्यात जास्तीत जास्त 35 लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 1133 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, या वर्षी 18 एप्रिल रोजी 12.847 सक्रिय रुग्ण आढळल्यानंतर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. 22 एप्रिल रोजी 1568 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

रिकव्हरी रेट 98.11 टक्के

यानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या नेहमीच कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा जास्त झाली. 19 एप्रिल रोजी कोरोना रिकवरी दर 62.58 वर आला होता. पण आता तो वाढून 98.11 झाला आहे. त्याच वेळी, 12 एप्रिल रोजी, सकारात्मकतेचा दर सर्वाधिक म्हणजे 55.73 टक्के होता, जो आता 0 वर आला आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 1.89 टक्के आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात 4,49,832 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यापैकी 59,809 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 58,776 बरे झाले आहेत. कोरोना लसीचा पहिला डोस जिल्ह्यातील 9.5 लाख लोकसंख्येच्या 40 टक्के लोकांना देण्यात आला आहे. त्याच वेळी, दोन्ही डोस 15 टक्के लोकांना देण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी कदम यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT