Aryan Khan

 

Dainik Gomantak 

महाराष्ट्र

आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरण गाजत आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला दिलासा मिळाला आहे. कोर्टाने आर्यनला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहण्यापासून सूट दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) म्हटले आहे की, जेव्हाही दिल्ली SIT समन्स बजावेल तेव्हा आर्यनला हजर राहावे लागेल. विशेष म्हणजे आर्यनने जामिनाच्या अटींमध्ये सुधारणा करण्यासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला होता.

दरम्यान, बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान याने ड्रग-ऑन-क्रूझ प्रकरणात जामीन मिळण्याची अट म्हणून अमली पदार्थ विरोधी एजन्सीच्या कार्यालयात साप्ताहिक हजेरीची अट बदलण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आर्यनच्या अर्जात त्याने दर शुक्रवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) दक्षिण मुंबई कार्यालयात हजर राहण्याची अट माफ करण्याची मागणी केली होती. हा तपास आता दिल्ली नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आल्याने त्याची मुंबईतील कार्यालयात हजर राहण्याची अट शिथिल करता येईल, असे या अर्जात म्हटले आहे. ड्रग्ज बाळगणे, सेवन, विक्री आणि खरेदी केल्याच्या आरोपाखाली NCB ने 3 ऑक्टोबर रोजी मुंबईतील एका क्रूझ जहाजावर छापा टाकून आर्यनला अटक केली होती. त्याला 28 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राफेलपासून एआयपर्यंत, 21 करारांतून भारत-फ्रान्स मैत्रीची नवी भरारी - संपादकीय

Maratha History: शक्तीपेक्षा युक्ती भारी! औरंगजेबाच्या अफाट सेनेला 'गनिमी काव्या'ने धूळ चारणारे 'शिवराय'

Kudnem House Fire: कुडणेत घराला भीषण आग; 10 लाखांचे नुकसान, अग्निशामक दलामुळे अनर्थ टळला

T20 World Cup: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! पाकिस्तानी फलंदाज साहिबजादा फरहान इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर

'एआय'च्या मदतीने होणार व्याघ्र गणना, राज्यातील वाघांची संख्या मेनंतर होणार स्पष्ट; मार्चपासून तीन टप्प्यांत मोहीम

SCROLL FOR NEXT