Ajit Pawar Plane Crash Dainik Gomantak
महाराष्ट्र

Ajit Pawar: "दादा परत या"! उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या समर्थकांना अश्रू अनावर; बारामती दुःखात हरवली Watch Video

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार सकाळी मुंबईहून बारामतीसाठी एका बैठकीसाठी निघाले होते. मात्र, विमान उतरत असताना हा अपघात झाला.

Sameer Panditrao

सकाळी बारामतीतून एक धक्कादायक बातमी आपल्यासमोर आली होती की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीत अपघात झाला आंणि त्यात त्यांचा दुःखद मृत्यू झाला. या घटनेमुळे महाराष्ट्र शोकाकुल झालेला आहे.

अजित पवार सकाळी मुंबईहून बारामतीसाठी एका बैठकीसाठी निघाले होते. मात्र, विमान उतरत असताना हा अपघात झाला. विमान धावपट्टीवरून घसरले आणि ते कोसळताच त्याला आग लागली. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला.

ही बातमी कळताच बारामती आणि आसपासचे नागरिक, अजित पवार दादांचे कार्यकर्ते इस्पितळाबाहेर जमले आहेत. अजूनही काही लोकांचा या बातमीवर विश्वास नाहीये. ही बातमी खोटी ठरावी आणि दादा समोर यावेत असे तिथे लोक अजूनही अश्रुपूर्ण डोळ्यांनी प्रार्थना करत आहेत.

अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरातील राजकीय नेत्यांनी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. महाराष्ट्रात दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Father Bolmax Pereira: बोलमॅक्स परेरा: गोव्याचा हरित धर्मगुरू हरपला

Shul Yog 2026: 14 जूनपासून ग्रहांचा मोठा प्रकोप! 'शूल योग' आणणार 5 राशींच्या आयुष्यात मोठं वादळ; नवीन नातं जोडताना शंभर वेळा विचार करा

Goa Betting Links: क्रिकेट सट्टेबाजी अन् मनी लॉन्ड्रिंगचे धागेदोरे अखेर गोव्यापर्यंत; वर्ध्यातील बडे क्रिकेट बुकी पोलिसांच्या रडारवर

Goa Politics: मगो पक्ष राष्ट्रीय पक्षांच्या दावणीला, ढवळीकरांवर प्रा. युगांक नाईकांची घणाघाती टीका; स्वतःचं मंत्रिपद टिकवण्यावर दिला भर

Goa Electric Vehicles: चार्जिंग स्टेशन अभावी होणारी ई-वाहनधारकांची वणवण आता थांबणार; प्रमुख रस्ते, हायवे आणि पर्यटनस्थळांवर होणार नव्या केंद्रांची निर्मिती

SCROLL FOR NEXT