Cricket Dainik Gomantak
क्रीडा

पावसामुळे गोव्याची मोहीम लांबली !

पुदुचेरीतील (Puducherry) पावसामुळे गोव्याची (Goa) 25 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील मोहीम दोन दिवसांनी लांबणीवर टाकण्यात आली.

दैनिक गोमन्तक

पणजी: पुदुचेरीतील (Puducherry) पावसामुळे गोव्याची (Goa) 25 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील मोहीम दोन दिवसांनी लांबणीवर टाकण्यात आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) एलिट ब गटाचे वेळापत्रक बदलले असून सामने शनिवारऐवजी ऐवजी सोमवारपासून खेळले जातील.

गोवा क्रिकेट असोसिएशनचे (Goa Cricket Association) सचिव विपुल फडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुदुचेरीत सध्या पाऊस आहे. त्यामुळे वेळापत्रक दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आले आहे. गोव्याचा संघ आता 22 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत सलग पाच सामने खेळेल. अगोदर ही स्पर्धा 20 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत खेळली जाणार होती.

बदललेल्या वेळापत्रकानुसार सुयश प्रभुदेसाईच्या (Suyash Prabhudesai) नेतृत्वाखालील गोव्याचा संघ रेल्वेविरुद्ध 22 रोजी पहिला सामना खेळेल. नंतर हरियाना (23 नोव्हेंबर), दिल्ली (24 नोव्हेंबर), राजस्थान (25 नोव्हेंबर), पंजाब (26 नोव्हेंबर) या संघांविरुद्ध गोव्याचे सामने होतील. हवामान खात्याच्या संकेतस्थळानुसार, पुदुचेरीत पुढील आठवड्यातील पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सामने प्रभावित होण्याचे संकेत आहेत. बीसीसीआय संकेतस्थळानुसार, एलिट विभागातील अन्य गटातील सामने शनिवारपासून खेळले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

SCROLL FOR NEXT