<div class="paragraphs"><p>Virat Kohli</p></div>

Virat Kohli

 

Dainik Gomantak 

क्रीडा

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेत टीम इंडिया मांगे मोर!

दैनिक गोमन्तक

सध्याच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाचा (Team India) इतिहास बदलण्याचा मानस आहे. जे काम ऑस्ट्रेलियाने 10 वेळा, इंग्लंडने 13 वेळा आणि श्रीलंकेने 1 वेळा केले आहे, ते टीम इंडियाला करायचे आहे. भारताला खरं तर दक्षिण आफ्रिकेचा 29 वर्षांचा इतिहास बदलायचा आहे. आणि हा इतिहास तेथील कसोटी मालिकेतील विजयाशी संबंधित आहे. भारताने 1992 पासून दक्षिण आफ्रिकेचे (South Africa) 7 दौरे केले आहेत. मात्र प्रत्येक वेळी तो रिकाम्या हाताने परतला. भारतासाठी मालिका जिंकणे तर दूरच, या काळात सामना जिंकणेही कठीण होते. आफ्रिकेच्या भूमीवर त्याने आतापर्यंत केवळ 3 कसोटी सामने जिंकले आहेत.

भारतीय संघाच्या (Team India) दक्षिण आफ्रिका दौऱ्याला 29 वर्षे झाली आहेत. परंतु श्रीलंकेच्या संघाने 20 वर्षात तेच केले. 1998 पासून त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा दौरा सुरु केला. मात्र 2019 मध्ये त्याने आपल्या पहिल्या कसोटी मालिकेतील विजयाची कहाणी रचली. श्रीलंकेने 2019 च्या दौऱ्यावर मालिका 2-0 ने जिंकून ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंडच्या क्लबमध्ये आपले नाव कोरले. आणि विशेष म्हणजे असे करणारा तो पहिला आशियाई संघ बनला. श्रीलंकेने (sri lanka) आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकूण 7 कसोटी मालिका खेळल्या आहेत, ज्यामध्ये त्यांना फक्त एकच कसोटी मालिका जिंकता आली आहे. यापूर्वी त्यांना 6 मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले होते.

दक्षिण आफ्रिकेवर ऑस्ट्रेलिया, इंग्लंडचे वर्चस्व

दक्षिण आफ्रिकेत आशियाई संघांचे वर्चस्व दिसले नसेल. पण ऑस्ट्रेलिया, इंग्लंडने तिथे खूप काही केले आहे. 1902 पासून दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या 15 कसोटी मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाने 10 जिंकले आहेत, 3 गमावले आहेत आणि 2 मालिका अनिर्णित आहेत. यादरम्यान त्याने एकूण 54 कसोटी खेळल्या, 29 जिंकल्या, 16 गमावल्या आणि 9 अनिर्णित राहिले.

दक्षिण आफ्रिकेत इंग्लंडला (England) आणखी चांगले निकाल मिळाले आहेत. 1889 पासून तेथे खेळल्या गेलेल्या 21 कसोटी मालिकेत त्याने 13 जिंकले, 5 गमावले आणि 3 अनिर्णित राहिले. यादरम्यान इंग्लंडने 85 कसोटी सामने खेळले, ज्यात 34 जिंकले, 20 हरले आणि 31 अनिर्णित राहिले.

भारताचा विजय

यावेळी टीम इंडिया इतिहासाची पाने उलटेल असा विश्वास क्रिकेट पंडितांना आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि श्रीलंकेच्या पंक्तीतही ती उभी राहणार आहे. कारण टीम कॉम्बिनेशन मजबूत आहे. संघाच्या गोलंदाजीत अनुभवाची खाण आहे, तसेच फलंदाजीतही अनुभव आणि उत्साह यांची सांगड चांगली आहे. 26 डिसेंबरपासून 3 कसोटी सामन्यांची मालिका सुरु होत आहे. आता या मालिकेत भारताने विजय मिळवला तर त्या विजयाचा काय फरक पडतो हे पाहावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Gas Leakage: गॅस बंद न करता झोपी गेले; वास्कोत गुदमरुन वाराणसीच्या एकाचा मृत्यू, तिघे अत्यवस्थ

Netravali: नेत्रावळीत शिकार पार्टीचे नियोजन भोवले; कदंबच्या 16 कर्मचाऱ्यांना काडतूससह रंगेहाथ पकडले

तेलंगणात 2.07 कोटी गोवा बनावटीचे मद्य जप्त; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशात दारु तस्करी

UP Crime: गर्लफ्रेन्डचे गोव्याला जाण्याचे स्वप्न पूर्ण करणं आलं अंगलट; सहा महिने वाचवलेले पैसे पाण्यात

Nuvem Accident : नुवेत कारच्या धडकेने दुचाकीस्‍वाराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT