Virat Kohli

 

Dainik Gomantak 

क्रीडा

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेत टीम इंडिया मांगे मोर!

सध्याच्या दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावर टीम इंडियाचा (Team India) इतिहास बदलण्याचा मानस आहे. जे काम ऑस्ट्रेलियाने 10 वेळा, इंग्लंडने 13 वेळा आणि श्रीलंकेने 1 वेळा केले आहे.

दैनिक गोमन्तक

सध्याच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाचा (Team India) इतिहास बदलण्याचा मानस आहे. जे काम ऑस्ट्रेलियाने 10 वेळा, इंग्लंडने 13 वेळा आणि श्रीलंकेने 1 वेळा केले आहे, ते टीम इंडियाला करायचे आहे. भारताला खरं तर दक्षिण आफ्रिकेचा 29 वर्षांचा इतिहास बदलायचा आहे. आणि हा इतिहास तेथील कसोटी मालिकेतील विजयाशी संबंधित आहे. भारताने 1992 पासून दक्षिण आफ्रिकेचे (South Africa) 7 दौरे केले आहेत. मात्र प्रत्येक वेळी तो रिकाम्या हाताने परतला. भारतासाठी मालिका जिंकणे तर दूरच, या काळात सामना जिंकणेही कठीण होते. आफ्रिकेच्या भूमीवर त्याने आतापर्यंत केवळ 3 कसोटी सामने जिंकले आहेत.

भारतीय संघाच्या (Team India) दक्षिण आफ्रिका दौऱ्याला 29 वर्षे झाली आहेत. परंतु श्रीलंकेच्या संघाने 20 वर्षात तेच केले. 1998 पासून त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा दौरा सुरु केला. मात्र 2019 मध्ये त्याने आपल्या पहिल्या कसोटी मालिकेतील विजयाची कहाणी रचली. श्रीलंकेने 2019 च्या दौऱ्यावर मालिका 2-0 ने जिंकून ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंडच्या क्लबमध्ये आपले नाव कोरले. आणि विशेष म्हणजे असे करणारा तो पहिला आशियाई संघ बनला. श्रीलंकेने (sri lanka) आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकूण 7 कसोटी मालिका खेळल्या आहेत, ज्यामध्ये त्यांना फक्त एकच कसोटी मालिका जिंकता आली आहे. यापूर्वी त्यांना 6 मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले होते.

दक्षिण आफ्रिकेवर ऑस्ट्रेलिया, इंग्लंडचे वर्चस्व

दक्षिण आफ्रिकेत आशियाई संघांचे वर्चस्व दिसले नसेल. पण ऑस्ट्रेलिया, इंग्लंडने तिथे खूप काही केले आहे. 1902 पासून दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या 15 कसोटी मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाने 10 जिंकले आहेत, 3 गमावले आहेत आणि 2 मालिका अनिर्णित आहेत. यादरम्यान त्याने एकूण 54 कसोटी खेळल्या, 29 जिंकल्या, 16 गमावल्या आणि 9 अनिर्णित राहिले.

दक्षिण आफ्रिकेत इंग्लंडला (England) आणखी चांगले निकाल मिळाले आहेत. 1889 पासून तेथे खेळल्या गेलेल्या 21 कसोटी मालिकेत त्याने 13 जिंकले, 5 गमावले आणि 3 अनिर्णित राहिले. यादरम्यान इंग्लंडने 85 कसोटी सामने खेळले, ज्यात 34 जिंकले, 20 हरले आणि 31 अनिर्णित राहिले.

भारताचा विजय

यावेळी टीम इंडिया इतिहासाची पाने उलटेल असा विश्वास क्रिकेट पंडितांना आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि श्रीलंकेच्या पंक्तीतही ती उभी राहणार आहे. कारण टीम कॉम्बिनेशन मजबूत आहे. संघाच्या गोलंदाजीत अनुभवाची खाण आहे, तसेच फलंदाजीतही अनुभव आणि उत्साह यांची सांगड चांगली आहे. 26 डिसेंबरपासून 3 कसोटी सामन्यांची मालिका सुरु होत आहे. आता या मालिकेत भारताने विजय मिळवला तर त्या विजयाचा काय फरक पडतो हे पाहावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कर्करोग रुग्णांसाठी दिलासा! आता तासनतास चालणारे उपचार अवघ्या 7 मिनिटांत होणार पूर्ण; 'रोश'ने भारतात लाँच केले नवीन इंजेक्शन

VIDEO: 9 वर्षांच्या चिमुरड्यानं पाकिस्तानी स्टारची काढली हवा, क्लीन बोल्डचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोलिंग

Goa Road Safety: खचलेला रस्ता तातडीने दुरुस्त करा! उगवेतील नागरिकांची मागणी, उदय महाले यांच्याकडून निवेदन सादर

Egg Prices: ब्रॉयलर अंडी पुन्हा महाग; ८० रुपये डझन; पुरवठा मुबलक; तरीही शंभर अंड्यांमागे शंभर रुपयांनी झाली वाढ

Viral Video: टिनशेड वाचवायला गेला अन् 50 फूट उंच हवेत उडून शेतात कोसळला, बरेलीतील थरार व्हायरल; व्हिडिओ पाहून नेटकरी अचंबित

SCROLL FOR NEXT