india pakistan victory match analysis Dainik Gomantak
क्रीडा

Suryakumar Yadav: 'शून्य'वर अभिषेक आऊट झाला आणि..! कॅप्टन सूर्याने सांगितले टीमच्या यशाचे गुपित; ईशान किशनबाबत म्हणाला की..

Ind Vs Pak Match Analysis: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याची उत्सुकता किती तरी पटीने वाढवण्यात आली होती, परंतु भारतीय संघाने त्यांना शरण आणत ६१ धावांनी विजय मिळवून पाकिस्तानच्या आव्हानाचा फुगा फोडून टाकला.

गोमन्तक डिजिटल टीम

कोलंबो: ज्या प्रकारे आम्हाला खेळ करायचा आहे, त्याच पद्धतीत आम्ही खेळ करतो. हाच आहे भारतीय संघाचा ब्रँड (खरी ओळख), अशा शब्दात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने रविवारी पाकिस्तानवर मिळवलेल्या शानदार विजयाचे वर्णन केले.

समोर प्रतिस्पर्धी कोणीही असला तरी आम्ही याच पद्धतीने खेळ करतो, असे भारतीय कर्णधार म्हणाला. टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याची उत्सुकता किती तरी पटीने वाढवण्यात आली होती, परंतु भारतीय संघाने त्यांना शरण आणत ६१ धावांनी विजय मिळवून पाकिस्तानच्या आव्हानाचा फुगा फोडून टाकला.

सामन्यानंतर बोलताना सूर्यकुमार म्हणाला ‘‘हे आमचे ‘ट्रेडमार्क’ क्रिकेट आहे. एक बाद शून्य अशी स्थिती असतानाही आमच्या विचारात बदल झाला नाही.’’

या बहुचर्चित सामन्यात दोन्ही संघातील प्रमुख फरक ठरलेल्या ईशान किशनच्या खेळाचे सूर्यकुमारने कौतुक केले. देशांतर्गत स्पर्धेत ज्या विचाराने आणि पद्धतीने ईशान खेळत आहे, तसाच खेळ तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही करत आहे.

१ बाद ० अशी अवस्था झालेली असताना कोणीतरी जबाबदारी घेण्याची गरज होती आणि ईशानने ती सहजतेने स्वीकारली. प्रतिहल्ला करून त्याने सामन्याचे चित्रच बदलले, असे सूर्यकुमारने सांगितले.

खेळपट्टी सहजतेने धावा करण्यास साथ देणारी नव्हती, डावाच्या मध्यावर धावगती कमी झाली होती, परंतु तिलक वर्मा, शिवम दुबे आणि रिंकू सिंग यांनी उत्तम फलंदाजी केली, असे सांगून सूर्यकुमार म्हणाला,

नेमक्या किती धावा निर्णायक ठरू शकतील, हे सांगणे कठीण होते, परंतु १७५ धावा केल्या तेव्हा आपण १५ ते २० धावा पुढे आहोत, याची जाणीव झाली.

कदाचित १५५ धावा असत्या, तर संघर्ष करावा लागला असता. हार्दिक पंड्याने पहिल्याच षटकात विकेट मिळवून सनसनाटी निर्माण केली, तर जसप्रीत बुमराने तो क्रिकेट विश्वास सर्वोत्तम गोलंदाज आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले. त्यानंतर प्रत्येक गोलंदाजाने योगदान दिले. आता अहमदाबादमध्ये परतल्यावर सोमवारी विश्रांती घेऊ आणि बुधवारच्या नेदरलँडसविरुद्धच्या सामन्याची तयारी करू, असे सूर्यकुमारने सांगितले.

फिरकी गोलंदाज अपयशी; सलमान

भारताविरुद्धच्या या सामन्यात आम्ही फिरकी गोलंदाजांवर पूर्णतः विसंबून होतो, परंतु रविवारचा दिवस आमचा नव्हता, तयार केलेल्या रणनीतीची अंमलबजावणी करू शकलो नाही, असे पाक कर्णधार सलमान आघाने सांगितले. आम्ही फलंदाजीतही कमी पडलो. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पॉवरप्लेममध्ये तीन किंवा चार विकेट गमावणे याचा फटका बसतो. पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही फलंदाजी करणे सोपे नव्हते, असे सलमान म्हणाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT