R Ashwin PTI
क्रीडा

IND vs ENG: टीम इंडियाला धक्का! आर अश्विनची तिसऱ्या कसोटीतून अचानक माघार, BCCI ने सांगितलं कारण

R Ashwin withdrawn from 3rd Test: राजकोटला चालू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आर अश्विनने अचानक माघार घेतली आहे.

Pranali Kodre

R Ashwin withdrawn from India vs England 3rd Test:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना गुरुवारपासून (15 फेब्रुवारी) राजकोटला सुरू झाला आहे. मात्र या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर मोठी बातमी समोर आली आहे. भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने या उर्वरित सामन्यातून तातडीने माघार घेतली आहे.

बीसीसीआयने याबद्दल शुक्रवारी रात्री (16 फेब्रुवारी) माहिती दिली आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार कौटुंबात मेडिकल एमर्जन्सी आल्याने अश्विनला चालू सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे तो घरी परतणार असून उर्वरित तिसरा सामना खेळणार आहे.

याशिवाय बीसीसीआयकडून आणि भारतीय संघाकडून त्याला या कठीण काळात पूर्ण पाठिंबा मिळेल, असेही बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.

बीसीसीआयने म्हटले की 'बीसीसीआय चॅम्पियन गोलंदाज आणि त्याच्या कुटुंबाला मनापासून पाठिंबा देत आहे. खेळाडूचे आणि त्याच्या जवळच्या लोकांचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. या कठीण काळात खेळाडूच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या खाजगी आयुष्याचा आदर राखला जावा अशी विनंती बोर्डाकडून करत आहोत.'

'बोर्डाकडून अश्विनला आवश्यक असलेली सर्व मदत मिळेल आणि त्याच्याशी गरज लागेल तो पाठिंबा देण्यासाठी सातत्याने संपर्कात राहू. हा संवेदनशील काळ चाहते आणि मीडिया समजून घेईल, अशी अपेक्षा भारतीय संघाला आहे.'

अश्विनने पूर्ण केले 500 विकेट्स

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की अश्विनने चालू असलेल्या कसोटीदरम्यानच शुक्रवारी त्याच्या कारकिर्दीत 500 कसोटी विकेट्सचा टप्पा पार केला होता. तो 500 कसोटी विकेट्स घेणारा जगातील नववा गोलंदाज आहे, तर भारताचा अनिल कुंबळेनंतरचा (619 विकेट्स) दुसराच गोलंदाज आहे.

त्याचबरोबर अश्विन सर्वात जलद 500 विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजही आहे. त्याने 98 व्या सामन्यात खेळतानाच 500 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्याआधी केवळ मुथय्या मुरलीधरन आहे. मुथय्या मुरलीधरनने 87 कसोटीत 500 विकेट्स घेतल्या होत्या.

सामन्यात फलंदाजांचे वर्चस्व

दरम्यान, राजकोट कसोटीत दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने पहिल्या डावात 35 षटकात 2 बाद 207 धावा केल्या आहेत. ते अद्याप 238 धावांनी पिछाडीवर आहेत. या सामन्यात पहिल्या डावात भारताने सर्वबाद 445 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT