मुंबई: भारत वि. अमेरिका सामन्याबद्दल भारताचा कप्तान सूर्यकुमार यादवने अत्यंत हसतमुख चेहऱ्याने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. गेला विश्वचषक आपण जिंकला आहे आणि यंदा आपण यजमान आहोत, याचा काय परिणाम होणार आहे, असे विचारता सूर्यकुमार म्हणाला, अपेक्षा वाढल्यात, कारण आपण गतविजेते आहोत आणि घरी खेळताना थोडे दडपण असते;
पण त्याच्या बरोबर चाहत्यांचा खूप पाठिंबा असतो त्याचा चांगला परिणाम होतो. आम्ही चाहत्यांना आनंदी करायचा प्रयत्न करत राहणार. त्यांची करमणूक करत राहणार. आम्हाला वर्तमानात राहून खेळावे लागेल तरच अपेक्षित निकाल आमच्या बाजूने लागायची शक्यता वाढेल.
संघाचे नेतृत्व करण्याबाबत तो म्हणाला, कप्तान म्हणण्यापेक्षा एका अत्यंत कौशल्याने भारलेल्या खेळाडूंच्या गटाचा मी नेता आहे, असे मला वाटते. भारतीय संघात प्रचंड गुणवत्ता आहे, याचा विचार करता अशा संघाचे नेतृत्व करायला मिळणे हे भाग्य आहे माझे.
जबरदस्त क्षमता आहे आपल्या संघात. ईशान किशन खूप मस्त लयीत खेळतोय आणि मला आशा आहे तो खेळतोय, तसाच बिनधास्त खेळत राहील. तसेच सध्या भारतीय संघामध्ये अनेक पर्याय आहेत. आपल्याकडे फक्त खूप विचार करून संघ निवडला जातो आणि त्यात बदल करावा लागला तर त्याचे थोडे वाईट वाटेल. पण आमचा संघ सज्ज झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.