आयसीसी टी-20 विश्वचषकात रविवारी भारत क्रिकेट संघ आणि पाकिस्तान क्रिकेट संघ यांच्यात झालेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने सर्वच आघाड्यांवर वर्चस्व राखत धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारताने १७६ धावांचे आव्हान उभे केले,
त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी अचूक व भेदक मारा करत पाकिस्तानचा डाव कोलमडवला. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ दबावाखाली कोसळला आणि अखेर भारताने हा सामना ६१ धावांनी जिंकत विश्वचषकातील आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली.
पाकिस्तानचा खेळ जवळपास खल्लास झाला असून भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले असून अवघ्या ९७ धावांत त्यांचे ९ गडी बाद झाले आहेत. सलग विकेट्समुळे पाकिस्तानचा डाव कोलमडला असून सामना भारताच्या बाजूने झुकलेला दिसत आहे.
आधी फलंदाजीमध्ये दमदार कामगिरी आणि त्यानंतर गोलंदाजीत भेदक मारा करत भारताने या सामन्यात ‘डबल अटॅक’ दाखवला आहे. भारतीय गोलंदाजांच्या अचूक लाइन-लेंग्थसमोर पाकिस्तानचे फलंदाज पूर्णपणे गोंधळले असून त्यांची अक्षरशः दाणादाण उडाल्याचे चित्र आहे. दबावाखाली पाकिस्तानचा डाव सावरण्यात अपयश ठरत असून अवघ्या ९५ धावांत त्यांचे ७ बळी बाद झाले आहेत, त्यामुळे सामना भारताच्या बाजूने झुकताना दिसत आहे.
पाकिस्तानला मोठा धक्का बसला असून कर्णधार बाबर आझम बाद झाला आहे. अष्टपैलू अक्षर पटेल याने अचूक टाकलेल्या चेंडूवर बाबरचा बचाव फसला आणि तो बाद झाला. भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध व भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. परिणामी सुरुवातीच्या षटकांतच सामना भारताच्या बाजूने झुकताना दिसत असून पाकिस्तानने अवघ्या ३४ धावांत ४ गडी गमावले आहेत.
सामन्याच्या सुरुवातीलाच पाकिस्तानच्या डावाला मोठा धक्का बसला असून अवघ्या १३ धावांत ३ गडी बाद झाल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यासमोर पाकिस्तानचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत, त्यामुळे सुरुवातीच्या षटकांतच सामना भारताच्या बाजूने झुकताना दिसत आहे. पाकिस्तानचे 13 धावांत 3 गडी बाद झाले आहेत.
पाकिस्तानला दुसरा मोठा धक्का बसला असून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या खतरनाक यॉर्करसमोर सलामीवीर सैम अयूब बाद झाला. बुमराहने टाकलेल्या अचूक आणि वेगवान यॉर्करवर सैम अयूब पूर्णपणे गोंधळून गेला आणि त्याचा बचाव अपयशी ठरला. सलग दोन लवकर विकेट्समुळे पाकिस्तानच्या डावावर मोठा दबाव निर्माण झाला असून भारताला सामन्यात निर्णायक आघाडी मिळाली आहे.
पाकिस्तानला या सामन्यात मोठा धक्का बसला असून सलामीवीर फरहान डावाच्या पहिल्याच षटकांत खाते न उघडताच बाद झाला आहे. हार्दिक पांड्याच्या अचूक टप्प्यावर टाकलेल्या चेंडूवर फरहानने दिलेला फटका थेट रिंकूच्या हातात गेला आणि तो शून्यावर झेलबाद झाला. पाकिस्तानच्या डावाला सुरुवातीलाच धक्का बसला आहे.
भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत १७५ धावा केल्या असून पाकिस्तानसमोर विजयासाठी १७६ धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताकडून सर्वाधिक धावा ईशान किशनने केल्या. त्याने ७७ धावांची आक्रमक खेळी साकारली.
कर्णधार सूर्यकुमार यादवने ३२ धावांचं योगदान दिलं, तर शिवम दुबेने २७ धावा केल्या. तिलक वर्माने २५ धावांची खेळी केली, तर रिंकू सिंग ११ धावांवर नाबाद राहिला. मधल्या फळीत विकेट्स पडल्या असल्या तरी ईशानच्या खेळीमुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.
पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांसमोर भारताच्या फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळत आहे. नियमित अंतराने गडी बाद होत असल्यानं भारतीय डावाची गती काहीशी मंदावली. १९ षटकांअखेर भारताने ५ गडी गमावत १५९ धावा केल्या आहेत. कर्णधार सूर्यकुमार यादव ३२ धावांवर झेलबाद झाला, तर अष्टपैलू शिवम दुबे २२ धावांवर नाबाद खेळत डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहे.
भारतीय संघाला चौथा मोठा धक्का बसला असून हार्दिक पांड्या शून्यावर बाद झाला आहे. सॅम अय्युबच्या १५व्या षटकात भारताला दोन धक्के बसले. याच षटकात तिलक वर्माची विकेटही पडली. तिलक वर्माने २४ चेंडूत २५ धावांची खेळी केली. आतापर्यंत भारताने १५ षटकांत १२७ धावा केल्या आहेत.
कर्णधार सूर्यकुमार यादव आणि युवा फलंदाज तिलक वर्मा सध्या मैदानात असून, दोघांकडून आक्रमक फटकेबाजीची चाहत्यांना मोठी अपेक्षा आहे. संयमी सुरुवातीनंतर आता धावगती वाढवण्याच्या दृष्टीने दोघेही खेळताना दिसत आहेत. आतापर्यंत भारताने १४ षटकांत १२५ धावा करत मजबूत स्थिती निर्माण केली असून, पुढील ६ षटकांत मोठे फटके पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
नवाजच्या गोलंदाजीतील १२व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर तिलक वर्माने दमदार षटकार ठोकत टीम इंडियाला शतकाचा टप्पा ओलांडून दिला. या षटकारासह भारताच्या १०० धावा पूर्ण झाल्या.
सॅम अय्युबनं शानदार गोलंदाजी करत ईशान किशनच्या स्फोटक खेळीला ब्रेक लावला आहे. सॅमच्या गोलंदाजीवर जागा करून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करताना इशानचा अंदाज चुकला आणि चेंडू थेट स्टंपवर आदळला. त्यामुळे इशान बोल्ड होत माघारी परतला आणि भारताला मोठा धक्का बसला. त्यानं ७७ धावा केल्या. भारताच्या १० षटकानंतर २ बाद ९२ धावा झाल्या आहेत.
ईशान किशननं आक्रमक शैलीत फलंदाजी करत केवळ 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं असून, ईशानच्या या झंझावाती खेळामुळे भारताच्या डावाला जबरदस्त गती मिळाली आहे. सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर दबाव टाकत त्यानं फटकेबाजी केलीय.
टीम इंडियाला पहिला धक्का बसला आहे. अभिषेक शर्ना शून्यावर बाद झालाय.
अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आता भारतीय फलंदाज फलंदाजी करण्यास उतरणार असून, सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
भारत-पाक सामन्याचा थरार सुरू व्हायला आता अवघी काही मिनिटं उरली आहेत. थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टॉस होणार असून, मैदानावर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यासाठी कोलंबोचे आर. प्रेमदासा स्टेडियम सज्ज झाले आहे. या महामुकाबल्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असून, दोन्ही संघ मैदानात दाखल झाले आहेत.
आयसीसी टी-20 विश्वचषकात आज 15 फेब्रुवारी रोजी भारत क्रिकेट संघ आणि पाकिस्तान क्रिकेट संघ यांच्यात हाय-व्होल्टेज सामना आर. प्रेमदासा स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट आहे. हवामान विभागानुसार दिवसा पावसाची शक्यता असून संध्याकाळपर्यंत परिस्थिती सुधारू शकते.
आर. प्रेमदासा स्टेडियमवर नवीन चेंडूवर सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना स्विंगमुळे फायदा होऊ शकतो. खेळ पुढे जाताच खेळपट्टी मंदावते, त्यामुळे गोलंदाजांना अतिरिक्त मदत मिळते आणि फलंदाजांसाठी मोठे फटके मारणे कठीण होते. येथे फिरकीही प्रभावी ठरते. पाकिस्तानचा उस्मान तारिक आणि भारताचा वरुण चक्रवर्ती निर्णायक भूमिका बजावू शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.