India Vs Australia third test match Sydney India need 107 runs to win with 5 wickets remaining 
क्रीडा

INDvsAUS तिसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला ५ विकेट्सची गरज, शेवटच्या २० ओव्हर्स निर्णायक

वृत्तसंस्था

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरूद्ध कसोटी मालिकेच्या सिडनीतील तिसऱ्या सामन्यात ४०७ धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी चांगला खेळ केला. ऋषभ पंतने दमदार खेळी करत भारताच्या विजयाची शक्याता कायम ठेवली. चहापानाच्या वेळेपर्यंत भारताच्या ५ बाद २८० धावा झाल्या होत्या. आता सगळा निर्णय शेवटच्या सत्रावर अवलंबून असून, हा सामना जिंकण्यासाठी भारताला  १०७  धावांची तर ऑस्ट्रेलियाला ५ बळींची गरज आहे. 


कर्णधार अजिंक्य रहाणेने पुजाराबरोबर फलंदाजी करताना चांगली सुरूवात करून दिली. रहाणे लवकर माघारी परतला, परंतु पंतने चांगली खेळी करत ११८ चेंडूमध्ये ९७ धावा केल्या. त्याच्या शतकाला अवघ्या तीन धावांनी हुलकावणी दिली. नॅथन लायनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. अत्यंत शांतपणे टिकून असलेला पुजारादेखील २०५ चेंडूत ७७ धावा करून त्रिफळाचीत झाला. आता शेवटच्या सत्रात जिंकण्यासाठी भारतीय गोलंदाजीवर सगळी मदार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मानवी दीर्घायुष्याचे रहस्य समुद्राच्या तळाशी? व्हेल माशांमधील 'या' प्रथिनामुळे माणूस जगू शकणार 200 वर्षे! संशोधनातून खुलासा

मुंबई इंडियन्समध्ये मोठा फेरबदल? हार्दिकची कॅप्टन्सी धोक्यात, आता सूर्या नव्हे तर तिलक वर्माकडे संघाची धुरा!

Goa Govt Jobs: गोव्यात 709 पदांची मेगा भरती! 16 मेपासून सीबीटी परीक्षा; पोलिस खात्यात 596 जागा

New Gas Connection: महिनाभरात 11 हजार नव्या 'गॅस जोडण्या', बेकायदा सिलिंडरला बसला चाप

Maratha History: रायगड ते जिंजी: छत्रपती शिवरायांनी कशी उभारली स्वराज्याची दक्षिण फळी?

SCROLL FOR NEXT