Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: इंदूरमध्ये दोन्ही संघांसाठी 'आश्चर्यकारक' योगायोग, होळकर स्टेडियम टीम इंडियासाठी लकी!

India vs Australia 2nd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 24 सप्टेंबर (रविवार) रोजी होणार आहे.

Manish Jadhav

India vs Australia 2nd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 24 सप्टेंबर (रविवार) रोजी होणार आहे. हा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे.

या सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करेल. सध्याच्या मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय संघ 1-0 ने पुढे आहे.

22 सप्टेंबर रोजी मोहाली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 5 गडी राखून पराभव केला.

इंदूरमध्येही कांगारुचा मार्ग सोपा नसेल, कारण होळकर स्टेडियमवर टीम इंडियाचा रेकॉर्ड खतरनाक आहे. चला तर मग टीम इंडियाच्या या खतरनाक रेकॉर्डबद्दल जाणून घेऊया...

इंदूरमध्ये टीम इंडिया 'अजिंक्य'

दरम्यान, होळकर स्टेडियमवर आतापर्यंत झालेल्या वनडे सामन्यांमध्ये भारताने वर्चस्व राखले आहे. टीम इंडियाच्या येथील दमदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाचा मार्ग सोपा नसेल. भारताने इंदूरमध्ये आतापर्यंत 6 वनडे सामने खेळले आहेत.

विशेष म्हणजे, हे सर्व सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. या मैदानावर टीम इंडियाने जगातील निवडक संघांना पराभूत केले आहे. या काळात भारताने इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडचा पराभव केला.

टीम इंडियाच्या (Team India) या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या सामन्यातही पराभवाला सामोरे जावे लागण्याची शक्यता दिसत आहे.

सहा वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला होता

इंदूरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे सामना खेळण्याची ही दुसरी वेळ असेल. याआधी 2017 मध्ये याच स्टेडियममध्ये दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता, ज्यामध्ये टीम इंडियाने कांगारुंचा 5 विकेट्स राखून पराभव केला होता.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 गडी गमावत 293 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅरॉन फिंचने 124 आणि स्टीव्ह स्मिथने 63 धावा केल्या होत्या.

भारताकडून (India) जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवने 2-2 विकेट घेतल्या होत्या. विजयासाठीचे 294 धावांचे लक्ष्य भारताने 5 गडी गमावून गाठले होते.

टीम इंडियासाठी हार्दिक पांड्याने सर्वाधिक 78, रोहित शर्माने 71 आणि अजिंक्य रहाणेने 70 धावा केल्या होत्या. सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याला 'सामनावीरा' चा किताब देण्यात आला होता.

सामन्याची तारीखही खास आहे

6 वर्षांपूर्वी इंदूरमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला, तो दिवस 24 सप्टेंबरचा होता. यावेळीही टीम इंडिया 24 सप्टेंबरला इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळणार आहे, हा योगायोगच म्हणावा लागेल. एकूणच आकडेवारी टीम इंडियाच्या बाजूने आहे. अशा स्थितीत भारताला हरवणे ऑस्ट्रेलियासाठी कठीण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind Vs SA: भारत की आफ्रिका! 'टॉस' ठरणार निर्णायक? महिला क्रिकेट टीम स्वप्नपूर्तीचा उंबरठ्यावर

Ponda: फोंडा पोटनिवडणुकीचा विषय 'दिल्ली'त! प्रदेशाध्यक्ष दामूंना पाचारण; उमेदवाराच्या नावावरून चर्चांना उधाण

Horoscope: अनपेक्षित घडामोडींसाठी तयार राहा, महत्वाच्या व्यक्तीशी भेट उपयोगी ठरेल; वाचा तुमच्या राशीचे भविष्य

World Cup 2025 Final: क्रिकेटचं वेड! तिकिटाचा दर 1.3 लाखांहून अधिक, तरीही 'फायनल' पाहण्यासाठी चाहत्यांची मुंबईत तुफान गर्दी

गोवा झालं महाग! पर्यटनाच्या नावाखाली लूट, 'कचऱ्याचे ढिग' आणि 'टॅक्सीवाल्यांची दादागिरी', पर्यटकाने शेअर केला धक्कादायक अनुभव

SCROLL FOR NEXT