Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: टीम इंडियाला मिळाला उपकर्णधार? अहमदाबाद कसोटीतील 'त्या' DRS नंतर चर्चांना उधाण

ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटीतील एका डीआरएसनंतर भारतीय कसोटी संघाच्या उपकर्णधाराबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Pranali Kodre

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अहमदाबादला नरेंद्र मोदी स्टेडियमवर चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी पहिल्या दोन्ही दिवशी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व ठेवलं. मात्र, असे असले तरी दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात भारताचे पुनरागमन झाले. दरम्यान, याच सत्रात झालेल्या एका घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

या सामन्यात पहिल्या दोन्ही सत्रात उस्मान ख्वाजा आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी दरमदार कामगिरी करत द्विशतकी भागीदारी पूर्ण केली होती. दरम्यान, दुसऱ्या सत्रात्या अखेरीस आर अश्विनने ग्रीनने 114 धावांवर बाद केले, तसेच एकूण तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर अखेरच्या सत्राच्या पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेलने ख्वाजाला पायचीत पकडले.

पण, पंचांनी आधी ख्वाजाला नाबाद दिले होते. पण भारताने त्यावर डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, यावेळी भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा मैदानातून बाहेर होता.

त्यामुळे रोहितच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी संघव्यवस्थापनाकडून चेतेश्वर पुजाराकडे दिली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण पुजाराने भारतीय संघ डीआरएस घेणार आहे, हा निर्णय पंचांना सांगितला होता.

पुजारा होणार उपकर्णधार?

दरम्यान, रोहितच्या अनुपस्थितीत पुजाराने डीआरएसचा निर्णय घेतल्याने त्याच्याकडे भारतीय कसोटी संघाचे उपकर्णधारपद देण्यात येणार आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. कारण काही दिवसांपूर्वीच जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती.त्यावेळी केएल राहुलला उपकर्णधारपदावरून हटवण्यात आले होते. तसेच या पदावर कोणत्याच खेळाडूची नियुक्ती झाली नव्हती. त्यामुळे आता भारतीय कसोटी संघाचे उपकर्णधारपद कोणाला मिळणार हा प्रश्न उभा राहिला होता. पण आता कदाचीत भारतीय संघ व्यवस्थापनाने या प्रश्नाचे उत्तर चेतेश्वर पुजाराच्या रुपात शोधले असण्याची शक्यता आहे.

ख्वाजा-ग्रीनची शतके

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 167.2 षटकात सर्वबाद 480 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ख्वाजाने 422 चेंडूत खेळताना 180 धावांची खेळी केली. तसेच ग्रीनने 170 चेंडूत 114 धावांची खेळी केली. त्याचबरोबर तळात टॉड मर्फीने 41 आणि नॅथन लायनने 34 धावांची खेळी केली.

भारताकडून या डावात आर अश्विनने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमीने 2 विकेट्स घेतल्या, तर रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colva Beach Pollution: कोलवा किनाऱ्याची झाली दैना! कचरा आणि अस्वच्छतेमुळे पर्यटकांनी फिरवली पाठ; स्थानिकांनी प्रशासनावर ओढले ताशेरे

Goa Assembly Election 2027: वेळ अजूनही गेलेली नाही! 2012चा इतिहास पुन्हा घडणार? गोव्यात बदलाची हवा वाहण्यासाठी विरोधकांची एकजूट हवीच

Goa Tiger Death: वाघाच्या मृत्यूनं खळबळ! खाणींच्या विळख्यात संपतोय 'जंगलाचा राजा'? पण वनखात्याची सोयीस्कर अनास्था

Cutbona Jetty: 100 बोटी, 3000 लोक पण मूलभूत सोयी शून्य! कुटबण जेटीवर आरोग्याचा प्रश्न झाला गंभीर, आमदारांनी दिला समस्या सोडवण्याचा शब्द

Bicholim Fish Price Hike: मान्सूनपूर्वी मासळीचे दर कडाडले! डिचोलीत ‘सुरमई’चा तोरा; मत्स्यखवय्यांच्या खिशाला कात्री

SCROLL FOR NEXT