Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: टीम इंडियाला मिळाला उपकर्णधार? अहमदाबाद कसोटीतील 'त्या' DRS नंतर चर्चांना उधाण

ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटीतील एका डीआरएसनंतर भारतीय कसोटी संघाच्या उपकर्णधाराबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Pranali Kodre

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अहमदाबादला नरेंद्र मोदी स्टेडियमवर चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी पहिल्या दोन्ही दिवशी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व ठेवलं. मात्र, असे असले तरी दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात भारताचे पुनरागमन झाले. दरम्यान, याच सत्रात झालेल्या एका घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

या सामन्यात पहिल्या दोन्ही सत्रात उस्मान ख्वाजा आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी दरमदार कामगिरी करत द्विशतकी भागीदारी पूर्ण केली होती. दरम्यान, दुसऱ्या सत्रात्या अखेरीस आर अश्विनने ग्रीनने 114 धावांवर बाद केले, तसेच एकूण तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर अखेरच्या सत्राच्या पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेलने ख्वाजाला पायचीत पकडले.

पण, पंचांनी आधी ख्वाजाला नाबाद दिले होते. पण भारताने त्यावर डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, यावेळी भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा मैदानातून बाहेर होता.

त्यामुळे रोहितच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी संघव्यवस्थापनाकडून चेतेश्वर पुजाराकडे दिली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण पुजाराने भारतीय संघ डीआरएस घेणार आहे, हा निर्णय पंचांना सांगितला होता.

पुजारा होणार उपकर्णधार?

दरम्यान, रोहितच्या अनुपस्थितीत पुजाराने डीआरएसचा निर्णय घेतल्याने त्याच्याकडे भारतीय कसोटी संघाचे उपकर्णधारपद देण्यात येणार आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. कारण काही दिवसांपूर्वीच जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती.त्यावेळी केएल राहुलला उपकर्णधारपदावरून हटवण्यात आले होते. तसेच या पदावर कोणत्याच खेळाडूची नियुक्ती झाली नव्हती. त्यामुळे आता भारतीय कसोटी संघाचे उपकर्णधारपद कोणाला मिळणार हा प्रश्न उभा राहिला होता. पण आता कदाचीत भारतीय संघ व्यवस्थापनाने या प्रश्नाचे उत्तर चेतेश्वर पुजाराच्या रुपात शोधले असण्याची शक्यता आहे.

ख्वाजा-ग्रीनची शतके

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 167.2 षटकात सर्वबाद 480 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ख्वाजाने 422 चेंडूत खेळताना 180 धावांची खेळी केली. तसेच ग्रीनने 170 चेंडूत 114 धावांची खेळी केली. त्याचबरोबर तळात टॉड मर्फीने 41 आणि नॅथन लायनने 34 धावांची खेळी केली.

भारताकडून या डावात आर अश्विनने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमीने 2 विकेट्स घेतल्या, तर रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! देवासमोर ठेवण्यासाठी मागितले दागिने, भामट्याने केली लंपास सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

Suryakumar Yadav Controversy: पाकची तक्रार फोल! 'सूर्या' फायनल खेळणार, उलट पाकिस्तानच आला अडचणीत; 'त्या' 2 खेळाडूंवर कारवाईची टांगती तलवार

'तू मूर्ख, देवाने तुला अक्कल कमी दिली; पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बोलशील तर...',शेर्लेकरांना भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा फोन कॉल समोर Audio

SCROLL FOR NEXT