Shubman Gill - Axar Patel X/BCCI
क्रीडा

IND vs ENG: गिलच्या शतकानंतरही टीम इंडिया 255 धावांत सर्वबाद, इंग्लंडला विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य

India vs England, 2nd Test: दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Pranali Kodre

India vs England, 2nd Test Match at Visakhapatnam:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणमला शुक्रवारपासून (2 फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव 78.3 षटकात 255 धावांवर संपुष्टात आला.

पण पहिल्या डावातील १४३ धावांच्या आघाडीसह भारताने इंग्लंडसमोर 399 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून दुसऱ्या डावात शुभमन गिलने शतकी खेळी केली.

भारताकडून दुसऱ्या डावात सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालला फारशी चांगली सुरुवात देता आली नाही. या दोघांनाही 10 षटकांच्या आतच इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने बाद केले.

कर्णधार रोहितने 13 धावा केल्या, तर पहिल्या डावात द्विशतक झळकावलेल्या यशस्वी जयस्वाल दुसऱ्या डावात 17 धावांवर बाद झाला.

मात्र त्यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला होता. गिल सुरुवातीलाच बाद होण्यापासून बचावला होता, याचा फायदा त्याने घेतला आणि आक्रमक फलंदाजी केली. गिलने अय्यरबरोबर तिसऱ्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली.

दरम्यान, अय्यर पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही मैदानात स्थिरावल्यानंतर बाद झाला. त्याला 29 धावांवर टॉम हर्टलीने बेन स्टोक्सकरवी झेलबाद केले. स्टोक्सने मागे पळत जात अय्यरचा सुरेख झेल टिपला. त्यापाठोपाठ 31 व्या षटकात रजत पाटीदारही 9 धावांवर माघारी परतला.

मात्र त्यानंतर गिलने अक्षर पटेलला साथीला घेतले. या दोघांनी भारताचा डाव पुढे नेताना 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला होता. दरम्यान, गिलने त्याचे तिसरे कसोटी शतकही पूर्ण केले.

मात्र शतकानंतर गिल 56 व्या षटकात बाद झाला. त्याला शोएब बशीरने बाद केले. त्याचा झेल बेन फोक्सने घेतला. त्याच्या विकेटसाठी इंग्लंडने डीआरएसचा वापर केला होता. त्यांनी घेतलेला रिव्ह्यू योग्य ठरला आणि त्यामुळे गिल 104 धावांवर बाद झाला. गिलने 147 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह ही खेळी केली.

गिल बाद झाल्यानंततर मात्र भारताचा डाव कोलमडला. त्याच्यानंतर अक्षर पटेलही 45 धावांवर टॉम हर्टलीविरुद्ध पायचीत झाला. पाठोपाठ केएस भरत (6) आणि कुलदीप यादवही (0) झटपट बाद झाले.

त्यानंतर आर अश्विनने झुंज देण्याचा प्रयत्न केला. यावेळी जसप्रीत बुमराहने बचावात्मक खेळत त्याला साथ दिली. मात्र अखेर बुमराह देखील 26 चेंडूत एकही धाव न करता बाद झाला. अखेर 79 व्या षटकात आर अश्विनला रेहान अहमदने बाद करत भारताचा डाव संपवला. अश्विन 29 धावांवर बाद झाला.

या डावात इंग्लंडकडून टॉम हर्टलीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच रेहान अहमदने 3 विकेट्स घेतल्या, तर जेम्स अँडरसनने 2 विकेट्स आणि शोएब बशीरने 1 विकेट घेतली.

या सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद 396 धावा केल्या होत्या, तर इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 253 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताला 143 धावांची आघाडी मिळाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Flood Crisis: आधी पाण्यासाठी तडफडला, आता महापुराची भीती! निसर्गाच्या दुहेरी चक्रव्यूहात अडकला पाकिस्तान; भारताकडून कोणताही डेटा मिळेना

King Cobra Viral Video: 'स्टंट' पडला महागात! किंग कोब्राला किस करण्यासाठी झुकला अन् क्षणार्धात जीवघेणा हल्ला; व्हिडिओ पाहून अंगावर काटा

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी! रिपोर्ट कधी जाहीर होणार आणि पगारात किती वाढ होणार? जाणून घ्या सर्व काही

'वो दबाव नहीं, सम्मान का हकदार है...', रोहितच्या निवृत्तीच्या वृत्ताने माजी क्रिकेटपटू संतापला; गंभीर-अजित टार्गेटवर

Guru Gochar 2026: नक्षत्रांचा राजा आणि देवगुरुंची युती! 'या' 5 राशींच्या आयुष्यात सुरु होणार सोन्यासारखा काळ; व्यवसायात नव्या आयडिया ठरतील सुपरहीट

SCROLL FOR NEXT