Former Indian cricketer Yashpal Sharma dies Dainik Gomantak
क्रीडा

भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचं निधन

1983 च्या विश्वचषकातही(Cricket) त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती.

दैनिक गोमन्तक

माजी भारतीय क्रिकेटपटू(Cricketer), 1983 च्या विश्वविजेत्या(World Cup) संघाचे सदस्य, आणि भारतीय निवडसमितीचे माजी सदस्य यशपाल शर्मा यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले, ते 66 वर्षांचे होते. (Cricket)

सकाळी मॉर्निंग वॉकवरून घरी परत आल्यावर त्यांना थोडेसे अस्वस्थ वाटून त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना लगेचच रुग्णालयात नेण्यात येत असताना रस्त्यातच त्यांचा सकाळी 7.40 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

यशपाल शर्मा हे एक उत्तम खेळाडू होते. 1983 च्या विश्वचषकात त्यांचा भारतीय संघात समावेश होता. इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्यांचे अर्धशतक आजही क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात आहे. त्यांनी भारतीय संघाकडून कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांत उकृष्ट कामगिरी केली आहे. शर्मा यांनी टीम इंडियाकडून 37 कसोटी सामन्यात 1606 धावा केल्या आहेत. यात, 2 शतके आणि 9 अर्धशतके त्यांच्या नावावर आहेत. कसोटी सामन्यात सर्वाधिक 140 धावा त्यांच्या नावावर आहेत.

याशिवाय, शर्मा यांनी भारताकडून 42 एकदिवसीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांत एकूण 883 धावा त्यांनी केल्या असून, त्यात 4 अर्धशतकांचा देखील समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 89 धावा यशपाल शर्मा यांच्या नावावर आहेत. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत यांच्या नावावर एकदाही शून्यावर बाद न होण्याचा विक्रमाची देखील नोंद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT