Weight Loss Drink Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Weight Loss Drink: वजन कमी करायचय; मग नारळाच्या पाण्यात मिक्स करा हा पदार्थ

अनेक लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी विविध उपाय करतात, पण पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही.

Puja Bonkile

Weight Loss Drink: अनेक लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी विविध उपाय करतात, पण पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही. लठ्ठपणा ही समस्या अनेक लोकांमध्ये दिसून येते. यामुळे अनेक शारीरिक आजार निर्माण होऊ शकतात. यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर तुम्ही नारळाच्या पाण्यात सब्जा मिक्स करून सेवन करू शकता.

नियितपणे दिवसातून एकदा नारळाच्या पाण्यात सब्जा मिक्स करून प्यायल्यास वजन झटपट कमी होऊ शकते. कारण नारळाचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असते. शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते तर सब्जामुळे अनेक आजार दूर राहतात. या दोन्हीमध्ये व्हिटॅमिन सी आणि पोटॅशिअम मुबलक प्रमाणात असते. यामुशे शरीर हायड्रेट आणि निरोगी राहते.

  • नारळ पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

1) पचनसंस्था सुरळित कार्य

नारळाच्या पाण्यात फायबर असते, ज्यामुळे पचनसंस्था सुरळित कार्य करते. तसेच कॅलरी बर्न करून वजन कमी करण्यास मदत करते. बद्धकोष्ठता आणि पोटासंबंधित आजार दूर ठेवते.

2) शरीर हायड्रेट राहते

नारळाचे पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर असते. शरीरात पाण्याची कमतरता जाणवल्यास आरोग्य तज्ञ नारळाचे पाणी पिण्याचा सल्ला देतात. यामुळे शरीर हायड्रेट राहते. उन्हाळ्यात नारळाचे पाणी पिणे फायदेशीर असते.

3) इम्युनिटी वाढवते

नारळाच्या पाण्यात अँटिऑक्सडेंट असतात. यामुळे शरीराला अनेक आजारंपासून दूर ठेवते. नियमितपणे नारळाचे पाणी प्यावे. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.

4) निरोगी हृदय

नारळाच्या पाण्यात अनेक पोषक घटक असतात. जे हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवम्यास मदत करते. तसेच हृदयविकार दूर रहातात.

5) चमकदार त्वचा

नारळ पाणी प्यायल्याने त्वचा चमकदार बनते. या पाण्यात अनेक पोषक घटक असतात ज्यामुळे त्वच्या समस्या कमी होतात. तसेच त्वचा मॉइश्चरायझ ठेवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

Mini Narkasur: दिवाळीची लगबग! 'मिनी नरकासुर' विक्रीसाठी सज्ज; किंमत वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT