Geeta Jayanti Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mahabharat: हजारो वर्षांपूर्वीचे गीताज्ञान आजच्या काळातही ठरते अमोघ आणि अमूल्य.. वाचा, गीता जयंती विशेष

भगवान श्रीकृष्णाने महाभारत युद्धापूर्वी अर्जुनाला गीतेचा उपदेश केला, अशी धार्मिक मान्यता आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

हिंदू पंचांगानुसार, गीता जयंती मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशीला साजरी केली जाते. यावर्षी 3 डिसेंबर 2022 (म्हणजेच आज) रोजी गीता जयंती साजरी होत आहे. हिंदू धर्मात गीता जयंतीला (Geeta Jayanti) विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने महाभारत (Mahabharat) युद्धापूर्वी अर्जुनाला गीतेचा उपदेश केला, अशी धार्मिक मान्यता आहे. असे म्हटले जाते की, जे दररोज गीता पठण करतात आणि गीतेमध्ये दिलेल्या उपदेशांचे पालन करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो. गीतेत सांगितलेल्या गोष्टी माणसाला भ्रमाच्या पाशातून काढून यशाच्या मार्गावर घेऊन जातात.

गीता जयंतीचे महत्त्व

गीतेमध्ये जीवनाचे संपूर्ण सार सांगितले आहे, ज्यामध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग या शिकवणींचा समावेश आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचे ज्ञान देऊन ऐहिक आसक्तीतून मुक्त केले. योग्य आणि अयोग्य यातील फरक सांगितला. असे म्हणतात की रणांगणात अर्जुन समोरच्या नातेवाईकांना पाहून विचलित झाला आणि त्याने शस्त्र उचलण्यास नकार दिला, तेव्हा सारथी झालेल्या भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचे ज्ञानाचे डोळे उघडण्यासाठी गीतेचा उपदेश केला.

महाभारतातील भीष्मपर्वाचा गीता हा भाग आहे. त्यात १८ अध्याय, ७०० श्लोक आहेत. गीतेत मानवाचा सर्वच अंगांनी विचार आहे. ‘गीता’ ही कल्याण करणारी ग्रंथरूपी देणगी मानवाला लाभली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग त्यात आहेत. गीता हा जगातील एकमेव ग्रंथ आहे, ज्याची जयंती साजरी केली जाते.

ज्ञानमूलक, भक्तिप्रधान निष्काम कर्मयोग हा गीतेचा गाभा,मर्म आहे हे प्रतिपादन करण्यासाठी लो.टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. हाच खरा गीताधर्म ! आपल्या कर्माची दिशा समाजधारणेकरिता ठरवणारे शास्त्र म्हणजे श्रीमद्भगवद्गीता असे टिळकांचे मत होते. त्यामुळे निवृत्तिपर कर्मसंन्यास किंवा भक्तिप्रधान असा गीतेचा अर्थ न लावता तो कर्मयोग म्हणजेच प्रवृत्तीपर आहे यावर टिळकांनी भर दिला. पारतंत्र्याच्या काळात जातीभेद, अंधश्रद्धा, दारिद्रय, रोगराई इ.मुळे गांजलेल्या समाजाला निवृत्ती कडून प्रवृत्तीकडे नेणारे टिळकांचे भाष्य राष्ट्रकार्यास भगवंताचे अधिष्ठान देणारे होते. देवकार्य आणि देशकार्य हे दोन्ही एकच आहे हा नवा वेदांत टिळकांनी सांगितला.

गीतेच्या शिकवणीत इतकी ताकद आहे की ती पाळणारा माणूस चांगल्या-वाईटातील फरक समजू शकतो. जीवन जगण्याची अद्भुत कला गीतेच्या श्लोकांत शिकवली आहे. गीतेतील शिकवण हि आजच्या काळात देखील उपयोगी पडते.

1. मन खंबीर बनवणे- भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की, जो मनुष्य मनाची दुर्बलता सोडून आपले कार्य करतो, त्याला यश मिळते, मनाच्या आत निर्माण होणारी शंका टाकून दिली पाहिजे. संशयाच्या अवस्थेत राहून यश मिळू शकत नाही.

2. फळाच्या अपेक्षेने काम करू नये- भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हे पार्थ, मनुष्याला फक्त त्याचे काम करण्याचा अधिकार आहे, त्याने फक्त त्याचे काम करावे. माणसाला त्याच्या कृतीच्या फळावर अधिकार नाही. यामुळे परिणामाची चिंता न करता माणसाने आपले काम खऱ्या मनाने केले पाहिजे.

3. मनावर नियंत्रण ठेवणे- जो माणूस आपल्या मनावर ताबा ठेवतो आणि त्याच्यासाठी विजय-पराजय, नफा-नुकसान, सुख-दु:ख हे सर्व समान असतात, तो माणूस जीवनात यशस्वी होतो कारण त्याने आपल्या मनावर ताबा ठेवला आहे.

4. क्रोधावर नियंत्रण ठेवा- भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले आहे की, क्रोधित होऊन अत्यंत मूर्ख भावना उत्पन्न होतात. त्यामुळे स्वतःच्या मनात संभ्रम निर्माण होतो. यामुळे बुद्धीचा नाश होतो, बुद्धी बिघडली की माणसाचा नाश होतो, यामुळे माणसाला राग येऊ नये.

5. शांती मिळवा- श्रीकृष्ण म्हणाले की, जो मनुष्य सर्व इच्छांचा त्याग करतो आणि अहंकारहीन आणि नि:स्वार्थ होतो, त्यालाच शांती मिळते. माणसाने काम, लोभ, आसक्ती आणि अभिमान सोडला पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT