Health Tips: तणावाची अनेक कारणे असू शकतात, जी आपल्या दिनचर्येवर सर्वात जास्त परिणाम करतात. कधी-कधी वाढता तणाव आपल्यासाठी घातक ठरु शकतो. या वाढत्या ताणाचे मूळ कारण खराब जीवनशैली, चिंता आणि खराब मानसिक आरोग्य असू शकते. यामुळे, अनेक वेळा आपल्याला अशक्तपणाही जाणवतो, ज्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. चला तर मग तणावामुळे शरीरावर काय परिणाम होतो ते जाणून घेऊया...
सततच्या ताणतणावामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते, ज्यामुळे शरीरात अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका वाढतो. जेव्हा ताण येतो तेव्हा शरीरात कॉर्टिसोल हार्मोन वाढते, ज्यामुळे शरीरात संसर्गाचा धोका वाढतो.
ताणतणावामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला ताण येतो तेव्हा शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तदाब वाढतो. बऱ्याचदा यामुळे एखाद्याला दीर्घकाळ उच्च रक्तदाबाचा त्रासही होऊ शकतो. याशिवाय, इतर अनेक गंभीर आजारांचा धोका देखील वाढू शकतो.
यामुळे भूक कमी लागते किंवा बरेच लोक तणावामुळे जास्त खायला लागतात. जेव्हा एखादी व्यक्ती तणावाखाली असते तेव्हा शरीर असे हार्मोन्स सोडते ज्यामुळे ती व्यक्ती कमी किंवा जास्त खाण्यास भाग पडते. याशिवाय, ताणतणावामुळे पोटातील आम्ल वाढते, ज्यामुळे आम्लपित्त आणि छातीत जळजळ होऊ शकते.
तणावाची अनेक कारणे असू शकतात, जसे की नातेसंबंधांमधील विविध समस्या, नोकरीचा (Job) ताण किंवा कधीकधी ठरलेल्या गोष्टी साध्य न होणे. दरम्यान, अशा तणावाच्या वेळी मानसोपचार तज्ञांचा सल्ला आवश्य घेतला पाहिजे. तसेच, तुम्हाला तुमचे जीवन व्यवस्थापित करायला शिकावे लागेल. तरच तुम्ही तणावापासून दूर राहू शकता. तुम्ही तुमचे आयुष्य दुरुस्त केल्याशिवाय यावर कोणतेही औषध किंवा उपाय काम करणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.