Mobile Dainik Gomantak
लाइफस्टाइल

iPhone-Samsung सह कंपन्यांनी सांगितला मोबाइल हँग न होण्याचा उपाय

दैनिक गोमन्तक

Mobile: मोबाईल आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. प्रत्येक कामात मोबाईलचा वाढता वापर लक्षात घेता मोबाईलचे महत्व लक्षात येते. मात्र हाच मोबाईल सतत बंद पडत असेल किंवा हॅंग होत असेल तर मोठी डोकेदुखी बनू शकतो.

ऑनलाइन पेमेंट, तिकिटे बुक करणे याशिवाय सोशल मिडिया आणि अनेक महत्वाचे इमेल्स आणि कॉल्स यासाठी हा मोबाईल नेहमीच आपल्या कामी येत असतो.

तुमचा मोबाईल सतत हँग होत असेल तर तुम्ही एक छोटीशी युक्ती वापरुन यातून मार्ग काढू शकता. हा मार्ग म्हणजे फोन रीस्टार्ट करणे. फोन जर रिस्टार्ट केला तर तो बराच काळ चांगला चालू शकतो.

तुम्ही तुमचा फोन रीस्टार्ट करता, तुम्ही त्याची सगळी प्रोसेस संपवून पुन्हा सुरू करता. फोन रिस्टार्ट केल्यानंतर तुमच्या फोनची मेमरी आणि प्रोसेसर रीफ्रेश करण्यात मदत करते. ज्यामुळे तुमचा फोन स्लो होण्याची आणि हँग होण्याची शक्यता कमी होते.

किती वेळा फोन रिस्टार्ट करावा?

जेव्हा आपण आपला फोन रीस्टार्ट करतो तेव्हा त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. परंतु, दर आठवड्याला हा फोन किती वेळा करावा हे देखील माहीत असणे गरजेचे आहे. तज्ञांच्या मतानुसार, आपण आपला फोन आठवड्यातून किमान तीन वेळा रीस्टार्ट केला पाहिजे.

मोबाईल कम्युनिकेशन कंपनी T-Mobile च्या मते, iPhone आणि Android फोन आठवड्यातून एकदा रीस्टार्ट केले पाहिजेत. रिस्टार्ट केल्यानंतर फोन चांगले काम करतो आणि मोबाईल स्लो होण्याची आणि हँग होण्याची शक्यता कमी होते.

सॅमसंग कंपनीच्या म्हणण्यानुसार, गॅलेक्सी फोन दररोज रीस्टार्ट केले पाहिजेत. यामुळे फोनची कार्यक्षमता सुधारते. सॅमसंग गॅलेक्सी फोनमध्ये ऑटो रीस्टार्ट सेट करण्याचा पर्याय देखील आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन रीस्टार्ट करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT