Goa LOP Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: 'गोव्यातील जातीय सलोखा बिघडवण्याचं काम सुरु, गोमंतकीयांची खरी ओळख...'; आलेमाव स्पष्टच बोलले

Communal Harmony In Goa: सर्व जाती धर्मातील लोकांशी बंधूभाव जपणारे,अशी गोमंतकीयांची ओळख आहे. सध्या राज्यातील शांतता, जातीय सलोखा बिघडविण्याचे कार्य सुरू आहे ते थांबायला हवे.

गोमन्तक डिजिटल टीम

सर्व जाती धर्मातील लोकांशी बंधूभाव जपणारे,अशी गोमंतकीयांची ओळख आहे. सध्या राज्यातील शांतता, जातीय सलोखा बिघडविण्याचे कार्य सुरू आहे ते थांबायला हवे. आम्ही सर्वानी एकत्र राहावे आणि राज्याचा नाश करू पाहणाऱ्या भाजप सरकार विरोधात एकत्र यावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले.

महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस मुख्य कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदार कार्लोस फरेरा, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप व इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

युरी आलेमाव म्हणाले की, आज लोकांनी महात्मा गांधी यांचे विचार जोपासून त्यांच्या विचारांनी वागणे गरजेचे आहे. माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप म्हणाले की, राज्यातील जमीन विक्रीचे प्रकार वाढू लागले आहेत. आमच्या पुढच्या पिढीला जमीन राहणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या तोंडात महात्मा गांधी आहेत, पण काळजात नथुराम गोडसे आहे. आम्हाला गांधींचे विचारांनी देश पुढे न्यायचा की गोडसेंच्या विचाराने हे ठरवायला हवे. राज्यात जातीय सलोखा बिघडविण्याचे काम होत असल्याने ते संबंधित नेत्यांनी थांबवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT