Worker union
Worker union Dainik Gomantak
गोवा

Workers Union: मागण्या मान्य करा, अन्‍यथा आंदोलन; कामगार युनियनचा सरकारला इशारा

दैनिक गोमन्तक

Workers Union: बालरथ कर्मचाऱ्यांचा प्रश्‍न गंभीर असून आपण त्यांना योग्य न्याय देणार आहे. बारा महिन्यांचे वेतन तसेच पगारात वाढ देखील करणार आहे, असे आश्‍‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले होते. परंतु अजून ते पूर्ण झालेले नाही.

सहन करण्याची देखील एक सीमा असते. आता सहनशीलतेची अंत होत असून पुढील पंधरा दिवसांत न्याय मिळाला नाही तर आम्ही आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा युनायटेड बालरथ कामगार युनियनच्‍या अध्यक्षा स्वाती केरकर यांनी दिला.

आझाद मैदानावर आयोजित पत्रकार परिषदेत केरकर बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, सचिव शिवकुमार नाईक, दिलीप गावडे व इतर बालरथ कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

शालेय व्यवस्थापनाकडून बालरथ कर्मचाऱ्यांना पगार देण्यात येतो, मात्र तो देण्यास विलंब केला जातो. सरकारने पैसे पाठविले नसल्याचे सांगण्यात येते. त्यांच्याकडून इतर कामे देखील करवून घेतली जातात. नकार दिल्यास कामावरून काढून टाकू असे सांगण्यात येते.

सरकारी कार्यक्रम, क्रीडा कार्यक्रम तसेच सरकारच्‍या विविध महोत्सवांनाही बालरथ मागविले जातात. पण कामाचे कोणतेही अतिरिक्त वेतन देण्यात येत नाही. तरीसुद्धा त्‍यांना ‘पार्ट टाईम’ कर्मचारी असे संबोधले जाते.

844 कर्मचाऱ्यांचा प्रश्‍न

बालरथ योजना सुरू होऊन 13 वर्षे पूर्ण होत आली. राज्यभर एकूण 422 बालरथ असून यामध्ये एक चालक व एक साहाय्यक नेमलेला आहे. त्यांची एकूण संख्या 844 एवढी आहे. 2016 साली आंदोलनानंतर बालरथ कर्मचाऱ्यांच्या वेतनात 10 टक्के वाढ करण्यात आली.

आता बालरथ चालकाला 11 हजार तर साहाय्यकाला 5 हजार 500 रूपये पगार मिळतो. तोही व्यवस्थापनाकडून पाच-सहा महिन्यानंतर दिला जातो. या कर्मचाऱ्यांना जीवन जगण्याएवढे तरी वेतन नको का? असा प्रश्‍न स्वाती केरकर यांनी उपस्थित केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT