Dam
Dam Dainik Gomantak
गोवा

Goa News: 'अभ्यास न करताच नवीन बंधारा बांधण्याचे प्रयोजन काय?'

दैनिक गोमन्तक

Goa News: जलसंवर्धनमंत्री सुभाष शिरोडकर यांनी वळंडव-काले येथे नवीन बंधारा बांधण्यासाठी स्थानिक आमदार गणेश गावकर यांच्या उपस्थितीत पायाभरणी केली आहे.

कुठल्याही तांत्रिक आणि भौतिक गोष्टींचा अभ्यास न करताच हा बंधारा बांधायचे प्रायोजन आणि नियोजन करण्यात आलेले आहे, असा आरोप शेतकरी तथा शिरोड्याचे माजी जिल्हा पंचायत सदस्य जयदीप शिरोडकर यांनी केला आहे.

पत्रकाराशी बोलताना जयदीप म्हणाले की, ज्या जागेत हा बंधारा बांधण्यात येणार आहे, त्या बंधाऱ्यापासून वरच्या बाजूला फक्त दोनशे ते तीनशे मीटरवर माजी मुख्यमंत्री कै. मनोहर पर्रीकर यांच्या कारकिर्दीत दहा ते बारा वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आलेला असून तो बंधारा आजपर्यंत उपयोगात आणला जात आहे.

असे असतानाही पूर्वीच्या बांधाऱ्याखाली फक्त दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरावर नवीन बंधारा बांधण्याचे प्रयोजन काय? हे एक मोठे कोडे आहे किंवा त्यात मोठा भ्रष्टाचार आहे असे स्पष्टपणे दिसून येत आहे.

हा बंधारा उभारून अस्तित्वात आला, तर त्याचे गंभीर आणि वाईट परिणाम संभाव्य बांधाऱ्याच्या वरच्या बाजूच्या शेतकऱ्यांना तसेच आजूबाजूच्या जनतेला यापुढेही भोगावे लागणार आहेत.

या संभाव्य बंधाऱ्यामुळे खास करून पावसाळ्यात या भागातील जनतेचे आणि शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे याचे सरकारने आणि जलसंवर्धन खात्याच्या मंत्र्यांनी भान ठेवावे.

आपली ढोबळ कार्यक्षमता लपविण्यासाठी तसेच जलसंवर्धन खात्याचे मंत्री या नात्याने आपण कशाप्रकारे कार्यक्षमरित्या काम करतो असे जनतेला भासवण्यासाठी तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची दिशाभूल करण्यासाठी या भागातील शेतकरी आणि बागयातदार यांचे नुकसान करून जलसंवर्धन खात्याच्या मंत्र्यांनी या भागातील जनतेचे नुकसान करू नये, असेही जयदीप शिरोडकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

Vasco News : सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण कोळशासाठी : कॅ. विरियातो फर्नांडिस

Lok Sabha Election 2024: ‘’चिदंबरम यांनी भ्रष्टाचार वाढवला, आरबीआयकडून सांगण्यात यायचे...’’; राजीव चंद्रशेखर यांचा हल्लाबोल

Cashew Farmer : निवडणुकीच्या धामधुमीत काजू उत्‍पादक वाऱ्यावर; उत्पादन कमी १६ हजार जणांना फटक

SCROLL FOR NEXT