CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant:...तर, राज्य सरकार घरोघरी आठ तास पाणीपुरवठा करू शकेल; CM सावंत यांची घोषणा

सरकारच्या तिजोरीत पाण्याच्या बिलातून मिळणारा महसूल 3% ने वाढला

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील जनतेने सहकार्य केल्यास राज्य सरकार घरोघरी आठ तास पाणीपुरवठा करू शकेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी सांगितले. आपण 24x7 पाणीपुरवठ्याबद्दल बोलत नसल्याचे स्पष्ट करून सावंत पुढे म्हणाले की, पाणी वाचवा मोफत पाणी योजनेअंतर्गत “55% घरांना मोफत पाणी मिळते”.

(Water bill revenue in the government coffers increased by 3%)

जल जीवन अभियानांतर्गत आयोजित सामुदायिक स्तरावरील प्रशिक्षणात सावंत बोलत होते. पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी, सरकार 16 रुपये खर्च करते, परंतु ते ग्राहकांना 3.5 रुपये दराने पुरवते, ते पुढे म्हणाले “राज्य सरकार जनतेला पाणी पुरवठा करण्यासाठी 13 रुपये खर्च करते.” सध्या, राज्याच्या मोफत पाणी वाचवा योजनेंतर्गत, 16,000 लिटरपर्यंतच्या पाण्याच्या वापरासाठी कुटुंबांकडून शुल्क आकारले जात नाही.

“मोफत पाणी देऊनही पाण्याच्या बिलातून मिळणारा महसूल 3% वाढला आहे,” असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले, ते म्हणाले, चार जणांच्या कुटुंबासाठी 16,000 लिटर पाणी पुरेसे आहे. राज्य सरकारला जनतेचे सहकार्य मिळाल्यास घरोघरी अधिक चांगले शुद्ध पाणी पुरवठा करता येईल, असे सांगून सावंत म्हणाले की, हर घर जल अंतर्गत पाणी देणारे गोवा हे पहिले राज्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT