Goa Governor Sreedharan Pillai Dainik Gomantak
गोवा

गाव हा राज्याचा मुखवटा: श्री पी एस श्रीधरन पिल्लई

'देशाची प्रगती व देश सुपर पॉवर होण्यास मदत होईल'

दैनिक गोमन्तक

हरमल: गोवा आत्मनिर्भर व स्वायत्त होण्यास अनेक उपाय योजना आखल्या आहेत. राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो, मात्र ग्रामीण भागात जाण्याचा उपक्रम हा केवळ संस्कृती व परंपरा ही गावातच दिसते. गाव हा राज्याचा मुखवटा असतो, ते अनुभवण्याचा प्रयत्न आहे. त्यांचे जतन, संवर्धन केल्यास, देशाची प्रगती व देश सुपर पॉवर होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई यांनी केले.

मांद्रे पंचायत समितीने आयोजित, राज्यपाल व पाच पंचायत सरपंचसाहित वार्तालाप कार्यक्रमात राज्यपाल श्री पिल्लई, मांद्रे दिनदयाळ सभागृहात बोलत होते. गोवा देशात महत्त्वाचे राज्य आहे. महात्मा गांधींनी ग्रामस्वराज्य ही संकल्पना मांडली होती.

राज्यपालांनी गावातील सरपंच लोकांशी हितगूज करून विकासास सहकार्य करावे व संस्कृती जाणून घ्यावी हा उद्देश आहे.राज्यपाल दैनंदिन प्रशासकीय अधिकार बाजूला ठेवतो हे विशेष. अनेकदा लोकशाहीत ‘सुप्रीम’कोण हा प्रश्न असतो. मात्र सुप्रिम कोण? राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री की आमदार, परंतु याचे उत्तर जनता, मतदार आहे व आम्ही लोकांचे सेवक आहोत हे होय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 वाढदिनी, त्यांच्या आवाहनानुसार, ग्रामीण भागात जाण्याचा संकल्प केला होता व तो सुरू ठेवला, असे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी केले.

व्यासपीठावर मांद्रे मतदारसंघाचे आमदार जित आरोलकर, सचिव मिहीर वर्धन, जिल्हाधिकारी उत्तर गोवा गोपाळ पार्सेकर, उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, मामलेदार अनंत मळीक, गटविकास अधिकारी मनेश केदार, मांद्रेच्या सरपंच प्रिया कोनाडकर, मोरजीच्या सरपंच वैशाली शेटगावकार,चोपडेचे सरपंच भगीरथ गांवकर, पार्सेच्या सरपंच प्रगती सोपटे, तुयेचे सरपंच सुहास नाईक होते. राज्यपालांनी डायलिसीस रुग्णांना आर्थिक साहाय्य वितरित केले. मांद्रेचे पंच राघोबा गावडे यांनी प्रास्ताविक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

SCROLL FOR NEXT